अ‍ॅपशहर

Covid Third Wave: भारतातील करोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत मोठा दावा; फेब्रुवारी अखेरपर्यंत...

Covid Third Wave: भारतात करोनाची तिसरी लाट धडकल्यानंतर रुग्णसंख्येत सातत्याने चढउतार पाहायला मिळत आहे. अशावेळी २३ जानेवारी रोजी देशात सर्वाधिक रुग्णसंख्येची नोंद होऊ शकते, असा अंदाज बांधण्यात आला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम | 18 Jan 2022, 8:06 am

हायलाइट्स:

  • भारतातील करोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत मोठा दावा.
  • रुग्णसंख्या २३ जानेवारीला पीक गाठण्याची शक्यता.
  • फेब्रुवारी अखेरपर्यंत तिसरी लाट ओसरू शकते.
बातमी थोडक्यात वाचण्यासाठी अॅप डाउनलोड करा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम omicron
प्रातिनिधिक फोटो
नवी दिल्ली: ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे भारतात करोना संसर्गाची तिसरी लाट धडकली आहे. देशातील प्रमुख महानगरांत प्रथम रुग्णसंख्येचा स्फोट झाला. त्यानंतर आता थोडंसं चित्र बदलून इतर भागात रुग्णसंख्या वाढत आहे. अशावेळी करोनाची तिसरी लाट २३ जानेवारी रोजी पीक गाठणार आणि २४ तासांत भारतात जवळपास ७ लाख रुग्णांची नोंद होऊ शकते असा अंदाज बांधण्यात आला आहे. ( Covid Third Wave In India Latest Breaking News )
वाचा: करोनाने मृत्यू झाल्यास 'या' पद्धतीने अंत्यसंस्कारास नकार; सुप्रीम कोर्ट काय म्हणालं?

आयआयटी कानपूरच्या सूत्र मॉडेलनुसार करोनाच्या तिसऱ्या लाटेतील पीकबाबत अंदाज वर्तवताना विविध बाबी विचारात घेण्यात आल्या आहेत. कोविड बाधित रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तीमध्ये लक्षणे दिसत असली तरच त्याची चाचणी करायची असे नवे निर्देश आता आयसीएमआरने दिले आहेत. या बदलामुळे चाचण्यांचे प्रमाण थोडे कमी झाले आहे. त्यामुळे रुग्णसंख्येच्या पीकबाबतचा अंदाज अगदी अचूक ठरेल की नाही हे आताच सांगता येत नसले तरी साधारण पीकची वेळ तीच असेल यावर मात्र अभ्यासकर्ते ठाम आहेत. महाराष्ट्र, गुजरात, हरयाणा आदी राज्यांत या आठवड्यात तर आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यांत पुढील आठवड्यात रुग्णसंख्या उच्चांक गाठेल असा अंदाज सूत्र मॉडेलची मांडणी करणारे प्राध्यापक मणिंद्र अग्रवाल यांनी व्यक्त केला.

वाचा: हिमालयात सापडली करोनाला संपवणारी 'संजीवनी'! IIT च्या संशोधकांचा दावा

भारतात करोनाची तिसरी लाट फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत समाप्त होईल, असा दावा सूत्र मॉडेलने केला आहे. त्यातच जानेवारीच्या अखेरच्या आठवड्यात देशातील रुग्णसंख्या पीक गाठेल आणि २३ जानेवारीला २४ तासांत ७ लाख रुग्णांची नोंद होऊ शकते, असा अंदाज बांधला गेला आहे. त्यामुळेच प्रत्यक्षात कोणती स्थिती उद्भवते हे येत्या आठवड्यात स्पष्ट होणार आहे. बिहारमध्ये १७ जानेवारी रोजी १८ हजार रुग्णांची नोंद होईल असे सांगण्यात आले होते. मात्र त्यापेक्षा कमी रुग्ण आढळले. उत्तर प्रदेशात १९ जानेवारी रोजी पीक असेल असे सांगण्यात आले आहे. त्यानुसार ४५ हजार रुग्णांचा अंदाज आहे. महाराष्ट्रातही १९ जानेवारी रोजी दीड लाख नवे रुग्ण नोंदवले जाऊ शकतात, असा अंदाज आहे. मात्र तशी कोणतीही स्थिती सध्या तरी दिसत नाही. सोमवारी महाराष्ट्रातील रुग्णसंख्येत मोठी घट झाली व ३१ हजारांपर्यंत रुग्णसंख्या खाली आली आहे.

वाचा: पंजाब विधानसभा निवडणूक पुढे ढकलली, आयोगाने केली नव्या तारखेची घोषणा

महत्वाचे लेख