अ‍ॅपशहर

तणाव वाढला; भारताने चीन सीमेवर जवान वाढवले

डोकलाममधून ना चिनी सैन्य मागे हटण्यास तयार आहे ना भारतीय लष्कर. गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेला हा तणाव आणखी वाढला आहे. भारताने चीन लगतच्या सीमेवर जवानांची संख्या वाढली आहे. सिक्कीम आणि अरुणाचलमध्ये भारताने आणखी जवान तैनात केले आहेत.

Maharashtra Times 11 Aug 2017, 9:49 pm
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम india deploys more troops along china border in sikkim arunachal
तणाव वाढला; भारताने चीन सीमेवर जवान वाढवले


डोकलाममधून ना चिनी सैन्य मागे हटण्यास तयार आहे ना भारतीय लष्कर. गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेला हा तणाव आणखी वाढला आहे. भारताने चीन लगतच्या सीमेवर जवानांची संख्या वाढली आहे. सिक्कीम आणि अरुणाचलमध्ये भारताने आणखी जवान तैनात केले आहेत. एवढचं नव्हे तर भारतीय लष्कराने सीमेवर पहारा देणाऱ्या जवानांना अधिक सतर्कतेचा इशारा दिला आहे. केंद्र सरकारमधील सूत्रांच्या माहितीवरून पीटीआयने हे वृत्त दिले आहे.

डोकलाममधून लष्कराला न हटवल्यास सैन्य कारवाई करण्याचा इशारा चीनने काही दिवसांपूर्वी भारताला दिला होता. याची दखल घेत भारत आणखी सावध झाला आहे. यासंदर्भात लष्कराच्या अधिकाऱ्यांनी कुठलीही माहिती देण्यास नकार दिला आहे.

भारतीय लष्कर सज्जः जेटली

डोकलाममध्ये तणाव सुरू असताना तिबेटमध्ये चिनी सैनिकांच्या हालचाली वाढल्या आहेत. तसंच भारतापेक्षा पाकिस्तानचा संरक्षण उद्योग उत्तम आहे, असं वक्तव्य पाकच्या एका लष्करी अधिकाऱ्याने केलं होतं. यावर संरक्षणमंत्री अरुण जेटली यांना लोकसभेत प्रश्न विचारण्यात आला होता. 'भारतीय लष्कर कुठल्याही अव्हानाला तोंड देण्यासाठी सज्ज आहे. कुठल्याही परिस्थितीत लढण्यासाठी सुरक्षा दलांकडे आवश्यक साधणं आहेत. यामुळे देशाच्या सुरक्षेवर शंका उपस्थित करण्याचं काहीच कारण नाही', असं जेटली यांनी स्पष्ट केलं.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज