अ‍ॅपशहर

Keral Floods: विदेशी मदत भारताने नाकारली

केरळमध्ये आलेल्या पुरानंतर चहुबाजूंनी मदतीचा ओघ सुरू आहे. देशातल्या विविध राज्यांकडून मदत येतच आहे, शिवाय अनेक देशांनीही मदतीचा हात पुढे केला आहे. मात्र, मदत करू इच्छिणाऱ्या या देशांचे आभार मानत भारताने त्यांची मदत नम्रपणे नाकारली आहे.

Indrani Bagchi | TNN 22 Aug 2018, 3:18 pm
नवी दिल्ली :
महाराष्ट्र टाइम्स.कॉम keral


केरळमध्ये आलेल्या पुरानंतर चहुबाजूंनी मदतीचा ओघ सुरू आहे. देशातल्या विविध राज्यांकडून मदत येतच आहे, शिवाय अनेक देशांनीही मदतीचा हात पुढे केला आहे. मात्र, मदत करू इच्छिणाऱ्या या देशांचे आभार मानत भारताने त्यांची मदत नम्रपणे नाकारली आहे.

केरळमध्ये पुरानंतर हजारो कोटी रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. युएई, कतार आणि मालदीव या देशांनी केरळमध्ये सुरू असलेल्या मदत आणि पुनर्वसन कार्यासाठी आर्थिक मदत देऊ केली होती. भारताने ही मदत नम्रपण नाकारली असून भारत स्वत:च्याच साधनसामग्रीचा वापर केरळच्या पुनर्वसनासाठी करणार आहे. मात्र परकीय देशांची मदत नाकारतानाच केरळमधील पूरग्रस्तांना खासगीरित्या सुरू असलेला मदतीचा ओघ मात्र सुरूच राहणार आहे.

युएईचे पंतप्रधान शेख मोहम्मद बिन रशीद अल मक्तूम यांनी केरळला ७०० कोटी रुपयांची मदत देऊ केली. मुख्यमंत्री पीनरयी विजयन यांनी त्यांचे आभारही मानले. मालदीवने केरळसाठी ५० हजार डॉलर्सची मदत जाहीर केली. काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी देखील जिनिव्हातल्या संयुक्त राष्ट्रसंघाकडे मदत मागितली. पण भारत सरकार कोणतीही विदेशी मदत स्वीकारणार नाही. २०१३ मधील उत्तराखंड प्रलयावेळीही युपीए सरकारने विदेशी मदत नम्रपणे नाकारली होती.
लेखकाबद्दल
Indrani Bagchi

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज