अ‍ॅपशहर

मंदीवर बिल गेट्स -'पुढचं दशक भारताचंच'

भारतामध्ये पुढच्या दशकात अत्यंत वेगाने आर्थिक प्रगती करण्याची क्षमता असल्याचं मत मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांनी व्यक्त केलं. यामुळे लोकांना मोठ्या प्रमाणात गरीबीतून बाहेर काढलं जाईल आणि सरकारला आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात गुंतवणूक करण्यास वाव मिळेल, असं ते म्हणाले. आधार कार्ड प्रणालीचंही बिल गेट्स यांनी कौतुक केलं. भारतीय वित्तीय सेवा क्षेत्र आणि औषध क्षेत्र चांगली कामगिरी करत असल्याचं ते म्हणाले.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 Nov 2019, 10:28 pm
नवी दिल्ली : भारतामध्ये पुढच्या दशकात अत्यंत वेगाने आर्थिक प्रगती करण्याची क्षमता असल्याचं मत मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांनी व्यक्त केलं. यामुळे लोकांना मोठ्या प्रमाणात गरीबीतून बाहेर काढलं जाईल आणि सरकारला आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात गुंतवणूक करण्यास वाव मिळेल, असं ते म्हणाले. आधार कार्ड प्रणालीचंही बिल गेट्स यांनी कौतुक केलं. भारतीय वित्तीय सेवा क्षेत्र आणि औषध क्षेत्र चांगली कामगिरी करत असल्याचं ते म्हणाले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम bill gates


जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीने आशियातील सर्वात मोठ्या तिसऱ्या अर्थव्यवस्थेवर भाकीत केल्यामुळे नव्या आशा पल्लवित झाल्या आहेत. काही तज्ञांनी आर्थिक मंदीची परिस्थिती दीर्घ काळासाठी राहण्याची भीती वर्तवली आहे. पण यावर बिल गेट्स म्हणाले, ‘जवळचं भविष्य मला माहित नाही. पण हे विश्वासाने सांगू शकतो, की पुढच्या एका दशकात भारतात अत्यंत वेगाने आर्थिक प्रगती करण्याची क्षमता आहे. लोक गरीबीतून बाहेर येतील, सरकार आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यास सक्षम होईल.’

खरी दानशूरता कशी असते?

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होण्याचा मान पुन्हा एकदा बिल गेट्स यांनाच मिळाला. त्यांची एकूण संपत्ती ११० अब्ज डॉलर्स झाली आहे. त्यांनी अमेझॉन इंकचे प्रमुख जेफ बेजॉस यांना मागे टाकत पुन्हा एकदा सर्वात श्रीमंत व्यक्ती होण्याचा मान मिळवला. बिल गेट्स यांनी आतापर्यंत ३५ अब्ज डॉलर रक्कम बिल अँड मेलिंडा गेट्स या संस्थेला दान केली आहे. या संस्थेकडून विविध देशात गरीबी दूर करणे आणि सामाजिक कामासाठी उपक्रम राबवले जातात.

श्रीमंतांच्या यादीत बिल गेट्स पुन्हा नंबर वन; बेजॉस यांना टाकलं मागे

बिल गेट्स सध्या तीन दिवसीय भारत दौऱ्यावर आहेत. ते त्यांच्या संस्थेच्या कामाचा आढावाही घेणार आहेत. एकीकडे भारत आर्थिक मंदीचा सामना करत आहे. तर बिल गेट्स यांनी भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये वेगाने प्रगतीची क्षमता असल्याचं म्हटलं आहे. चालू वित्तीय वर्षातील पहिल्या तिमाहीत आर्थिक विकास दर घटून पाच टक्क्यांवर आला आहे. हा गेल्या सहा वर्षातील देशाचा सर्वात कमी तिमाही दर आहे.

Pm मोदींना बिल गेट्स यांच्याकडून ग्लोबल गोलकीपर्स पुरस्कार

आधार प्रणालीवर बिल गेट्स म्हणाले, ‘आधार ओळखपत्र प्रणाली आणि लोकांमध्ये यूपीआय पेमेंट प्रणालीला ज्या पद्धतीने स्वीकारलं जात आहे, ते कौतुकास पात्र आहे. यामुळे काही चांगले अनुभवही मिळाले आहेत. आपल्याला नंदन नीलेकणी यांच्यासारख्या लोकांकडून भागीदारी करण्याबाबत विचार करायला हवा. डिजीटल ओळख किंवा वित्तीय सेवा प्रणाली कशी लागू केली जाऊ शकते, याबाबत इतर देश भारताकडून शिकू शकतात.’ यासोबतच लोकांची जीवनशैली सुधारण्यासाठी सरकारच्या प्रयत्नांचंही त्यांनी कौतुक केलं.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज