अ‍ॅपशहर

भारत मुस्लिमांसाठी स्वर्ग: नक्वींचा ओआयसीवर पलटवार

भारतीय मुस्लिम धर्मियांसाठी भारत हा स्वर्ग आहे, असे म्हणत केंद्रीय अल्पसंख्याक कार्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी इस्लामी देशांची संघटना ओआयसीवर पलटवार केला आहे. जे लोक भारतातील वातावरण बिघडविण्याचे काम करत आहेत, ते भारतातील मुस्लिमांचे कधीही मित्र असू शकत नाहीत, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Apr 2020, 6:15 pm
नवी दिल्ली: भारतावर इस्लामोफोबियाचा आरोप करणाऱ्या इस्लामी देशाची संघटना ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन (ओआयसी) भाजप नेते आणि केंद्रीय अल्पसंख्याक कार्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी पलटवार केला आहे. भारत हा मुस्लिमांसाठी स्वर्ग आहे. देशातील अल्पसंख्याक समुदायांसह सर्व वर्गांचे अधिकार सुरक्षित आहेत, मात्र काही लोक दुष्प्रचार आणि खोट्या बातम्या पसरवून देशाच्या एकतेविरुद्ध कारस्थान रचत आहेत, असे मुख्तार अब्बास नक्वी यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सर्व वर्गांचा विकास होत असून देशात कोणाशी भेदभाव केला जात नाही, असेही नक्वी यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mukhtar-abbas-naqvi


धर्मनिरपेक्षता आणि सद्भावना ही भारतीयांसाठी फॅशन नसून एक पॅशन आहे. ही आमच्या देशाची शक्ती आहे. याच शक्तीमुळे देशातील अल्पसंख्याकांसह सर्वच लोकांचे धार्मिक, सामाजिक अधिकार सुरक्षित आहेत, असे नक्वी पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात लांगुलचालन न करता सशक्तिकरणाच्या भावनेसह सर्वांना विकासाशी जोडले जात आहे, असे नक्वी पुढे म्हणाले. लोकांनी काही लोक करत असलेल्या कारस्थानांपासून दूर राहिले पाहिजे, असे सांगताना देशातील वातावरण बिघडविणारे लोक भारतीय मुसलमानांचे मित्र कधीही असू शकत नाहीत, असा टोलाही नक्वी यांनी लगावला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज