अ‍ॅपशहर

भारताची भीती वाढवणारा दिवस; इटलीलाही मागे टाकलं

भारतात करोनाचा कहर सुरूच आहे. देशात एका दिवसातील सर्वात जास्त मृत्यू आणि नवे रुग्ण समोर आले आहेत. यासोबतच भारताने इटलीलाही मागे टाकलं आहे. भारतातील रुग्णवाढीचा दर पाहता येत्या काही दिवसात भारत ब्रिटन आणि स्पेनलाही मागे टाकण्याचं चित्र दिसत आहे. शुक्रवारी एकाच दिवासत ९८८७ रुग्ण समोर आल्याने एकूण रुग्णसंख्या २ लाख ३६ हजार ६५७ एवढी झाली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 6 Jun 2020, 1:40 pm
नवी दिल्ली : भारतात शुक्रवारी करोना रुग्णसंख्येने आतापर्यंतचा सर्वोच्च एक दिवसाचा आकडा गाठला आहे. शुक्रवारी एकाच दिवासत ९८८७ रुग्ण समोर आल्याने एकूण रुग्णसंख्या २ लाख ३६ हजार ६५७ एवढी झाली आहे. सोबतच भारताने करोनाने सर्वाधिक कहर घातलेला देश इटलीलाही मागे टाकलं आहे. दरम्यान, इटलीत ३३ हजार ७७४ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला, तर भारतात ६६४९ मृत्यू झाले आहेत. भारतात अनलॉक १ सुरू झालं असतानाच असे आकडे समोर येण्यामुळे चिंता प्रचंड वाढली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम india now sixth worst corona virus hit country surpasses italy
भारताची भीती वाढवणारा दिवस; इटलीलाही मागे टाकलं


राज्यसभा: 'अशी' चाल खेळून काँग्रेस कर्नाटकात भाजपला रोखणार?

करोनामुळे सर्वात प्रभावित झालेल्या देशांमध्ये अमेरिका वरच्या स्थानावर आहे. अमेरिकेत आतापर्यंत १९ लाखांपेक्षा जास्त जणांना करोनाची लागण झाली आहे. तर अमेरिकेत एक लाख ११ हजार ३९० रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. अमेरिकेत १० लाख लोकसंख्येमागे ३३५ जणांचा करोनाने बळी घेतला आहे. अमेरिकेत आतापर्यंत साडे चार लाखांपेक्षा जास्त जणांनी करोनावर मातही केली आहे.

भारतात रुग्णवाढीचा वेग कायम

गेल्या काही दिवसात भारतात रुग्णसंख्येचा आलेख वाढताच आहे. देशात प्रति १० लाख लोकसंख्येमागे ५ जणांचा मृत्यू झाला आहे. देशाची लोकसंख्या इतर देशांच्या तुलनेत जास्त असल्यामुळे हा दर कमी आहे. इटलीशी तुलना केली तर इटलीत प्रति १० लाख लोकसंख्येमागे ५५९ जणांचा मृत्यू झाला. तर इटलीत १ लाख ६४ हजार रुग्ण बरे झाले आहेत. देशातील करोना उद्रेकाचा वेग पाहिला तर येत्या काळात भारत युरोपियन देशांनाही मागे टाकण्याची शक्यता आहे. ब्रिटन आणि स्पेनला मागे टाकत भारत पुढील काही दिवसात सर्वात प्रभावित चौथा देश ठरू शकतो.

देशात करोनाची आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ; केंद्राने जाहीर केली आकडेवारी

शुक्रवारी एकाच दिवसात सर्वाधिक केस समोर येण्याचा नवा विक्रम झाला. तर सर्वाधिक मृत्यूंचीही नोंद करण्यात आली. शुक्रवारी देशात २९५ रुग्णांचा करोनाने बळी घेतला, जो आतापर्यंतचा सर्वात जास्त भीतीदायक आकडा आहे. भारताने मृत्यू दर नियंत्रणात ठेवला असला तरी संक्रमणाचा दर हा आवाक्याच्या बाहेर गेल्याचं चित्र आहे. देशातील रुग्णालयांमध्ये बेड उपलब्ध नसल्याचं चित्र असतानाच ही वाढ चिंता वाढवणारी आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज