अ‍ॅपशहर

‘हा अंतर्गत विषय’

संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेत चीनचे परराष्ट्रमंत्री वँग यी यांनी जम्मू-काश्मीर आणि लडाखबद्दल केलेल्या वक्तव्यावर भारताने तीव्र आक्षेप घेतला. 'काश्मीर आणि लडाख हे भारताचे अविभाज्य भाग आहेत. या भागासंदर्भात अलिकडे घडलेल्या घडामोडी या संपूर्णपणे भारताचा अंतर्गत विषय आहे', असा सूचक इशारा परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी दिला.

Maharashtra Times 29 Sep 2019, 4:24 am
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम India-objects-to-China


संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेत चीनचे परराष्ट्रमंत्री वँग यी यांनी जम्मू-काश्मीर आणि लडाखबद्दल केलेल्या वक्तव्यावर भारताने तीव्र आक्षेप घेतला. 'काश्मीर आणि लडाख हे भारताचे अविभाज्य भाग आहेत. या भागासंदर्भात अलिकडे घडलेल्या घडामोडी या संपूर्णपणे भारताचा अंतर्गत विषय आहे', असा सूचक इशारा परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी दिला.

चीनने संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेत काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला होता; तसेच हा 'वाद' शांततामय मार्गाने, तसेच यूएन चार्टर, सुरक्षा परिषदेचे ठराव आणि द्विपक्षीय करारांनुसार सोडवला जावा, तसेच 'जैसे थे' स्थितीत बदल होईल, अशी कोणतीही एकतर्फी कृती केली जाऊ नये, असे म्हटले होते. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांचा शेजारी म्हणून चीनला हा वाद प्रभावीपणे सोडवला जाईल आणि स्थैर्य येईल, अशी आशा आहे, असेही चीनने म्हटले आहे. त्याला भारताने प्रत्युत्तर दिले. 'जम्मू, काश्मीर आणि लडाख भारताचा अविभाज्य भाग असल्याची भारताची भूमिका चीनला चांगल्या प्रकारे माहिती आहे, असे रवीश कुमार यांनी स्पष्ट केले. गेल्या महिन्यात भारताने जम्मू-काश्मीरबाबतचे कलम ३७० रद्द केले; तसेच काश्मीर आणि लडाख या दोन केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती केली आहे. या निर्णयाला पाकिस्तानने विरोध केला आहे.

चीनचे म्हणणे काय?

'यूएन चार्टर', सुरक्षा परिषदेचे ठराव आणि द्विपक्षीय करार याद्वारे काश्मीरच्या वादावर तोडगा काढायला हवा, असे चीनने संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेत सांगितले. याशिवाय 'जैसे थे' स्थितीत बदल होईल, अशी एकतर्फी कृती केली जाऊ नये, असेही चीनने म्हटले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज