जयपूर : भारताने उर्वरित जगाला दिशा दाखवावी, अशी अपेक्षा व्यक्त होत असून उर्वरित जग हे भारताकडे मोठ्या आशेने बघत आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी रविवारी येथे एका कार्यक्रमात केले.
अनेक प्रकारचे प्रयोग करून जगभरातील देश थकले आहेत. आता जगाचे लक्ष हे पूर्वेकडे म्हणजे भारत व चीनकडे आहे. मात्र चीनबाबत अनेक देशांना साशंकता आहे. त्यामुळेच ते आपल्याकडे मोठ्या आशेने बघत आहेत, असे भागवत म्हणाले. या अपेक्षेच्या कसोटीवर उतरण्यासाठी देशात होणाऱ्या चांगल्या कामांना प्रोत्साहन द्यायला पाहिजे. त्यातूनच आपण जगाचे नेतृत्व करू शकू. समाजाची अथवा देशाची सेवा करताना प्रसिद्धीचा विचार करू नये. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य अशा निरपेक्ष भावनेने होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
अनेक प्रकारचे प्रयोग करून जगभरातील देश थकले आहेत. आता जगाचे लक्ष हे पूर्वेकडे म्हणजे भारत व चीनकडे आहे. मात्र चीनबाबत अनेक देशांना साशंकता आहे. त्यामुळेच ते आपल्याकडे मोठ्या आशेने बघत आहेत, असे भागवत म्हणाले. या अपेक्षेच्या कसोटीवर उतरण्यासाठी देशात होणाऱ्या चांगल्या कामांना प्रोत्साहन द्यायला पाहिजे. त्यातूनच आपण जगाचे नेतृत्व करू शकू. समाजाची अथवा देशाची सेवा करताना प्रसिद्धीचा विचार करू नये. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य अशा निरपेक्ष भावनेने होत असल्याचे त्यांनी नमूद केले.