मयुरेश प्रभुणे, श्रीहरिकोटा
भारताचे ‘चांद्रयान-२’ हे महत्त्वाकांक्षी यान सोमवारी दुपारी यशस्वीरीत्या चंद्राच्या दिशेने झेपावले आणि भारताने अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रात भरारी घेतली. ‘काउंट डाऊन’ संपताच नारिंगी रंगाच्या समांतर ज्वाळांचे लोट खाली सारत ‘जीएसएलव्ही मार्क ३’ हा प्रक्षेपक (प्रचंड ताकदीमुळे त्याचा उल्लेख ‘बाहुबली रॉकेट’ असा केला जातो) वेगाने आकाशाच्या दिशेने झेपावला. आसमंत हादरवणाऱ्या रॉकेटच्या आवाजात टाळ्या-शिट्ट्यांसह ‘भारत माता की जय’च्या घोषणाही निनादल्या. श्रीहरिकोटा बेटावर देशभरातून आलेल्या आबालवृद्धांच्या समुदायाने भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) शास्त्रज्ञांची आणि स्वदेशी तंत्रज्ञानाची कमाल ‘याची देहि याची डोळा’ अनुभवली. देशाच्या दुसऱ्या चांद्रमोहिमेचा पहिला टप्पा यशस्वीपणे सर झाला आणि ‘चांद्रयान-२’ चंद्राच्या दिशेने मार्गस्थ झाले!
इस्रोच्या ‘जीएसएलव्ही मार्क ३’ने श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रावरून सोमवारी दुपारी दोन वाजून ४३ मिनिटांनी यशस्वी उड्डाण केले. उड्डाणानंतर १६ मिनिटे आणि १४ सेकंदांनी ‘चांद्रयान-२’ला पृथ्वीभोवती १६९ बाय ४५,४७५ किलोमीटरच्या दीर्घवर्तुळाकार कक्षेत प्रस्थापित करण्यात इस्रोच्या शास्त्रज्ञांना यश आले. ‘जीएसएलव्ही मार्क ३’ या अजस्र रॉकेटचे हे पहिलेच ‘ऑपरेशनल’ उड्डाण होते. ‘चांद्रयान-२’च्या रूपाने भारतीय भूमीवरून अवकाशात सर्वाधिक वजनाचे (३,८७२ किलो) प्रक्षेपण करण्याचाही विक्रम घडला.
सोमवारच्या प्रक्षेपणातून भारताच्या दुसऱ्या चांद्रमोहिमेचा पहिला टप्पा यशस्वीपणे पार पडला असून, आता ‘चांद्रयान-२’ला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवण्याचे आव्हान ‘इस्रो’समोर असणार आहे. पृथ्वीभोवतीच्या कक्षेत पोहोचल्यावर यानाचे सोलर पॅनेल स्वयंचलित पद्धतीने उघडले असून, ‘इस्रो टेलिमेट्री, ट्रॅकिंग अँड कमांड नेटवर्क’ने (इसट्रॅक) यानावर नियंत्रण मिळविले आहे. पुढील महिन्याभराच्या कालावधीमध्ये यानावर बसवण्यात आलेल्या इंधन यंत्रणेच्या मदतीने यानाची पृथ्वीभोवतीची कक्षा टप्प्याटप्प्याने वाढवून चंद्रापर्यंत नेण्यात येईल. त्यानंतर यानाला चंद्राभोवतीच्या कक्षेत प्रस्थापित करून, ‘विक्रम’ लँडर आणि ‘प्रज्ञान’ रोव्हरला ७ सप्टेंबरला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवण्यात येईल.
भारताचे ‘चांद्रयान-२’ हे महत्त्वाकांक्षी यान सोमवारी दुपारी यशस्वीरीत्या चंद्राच्या दिशेने झेपावले आणि भारताने अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रात भरारी घेतली. ‘काउंट डाऊन’ संपताच नारिंगी रंगाच्या समांतर ज्वाळांचे लोट खाली सारत ‘जीएसएलव्ही मार्क ३’ हा प्रक्षेपक (प्रचंड ताकदीमुळे त्याचा उल्लेख ‘बाहुबली रॉकेट’ असा केला जातो) वेगाने आकाशाच्या दिशेने झेपावला. आसमंत हादरवणाऱ्या रॉकेटच्या आवाजात टाळ्या-शिट्ट्यांसह ‘भारत माता की जय’च्या घोषणाही निनादल्या. श्रीहरिकोटा बेटावर देशभरातून आलेल्या आबालवृद्धांच्या समुदायाने भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) शास्त्रज्ञांची आणि स्वदेशी तंत्रज्ञानाची कमाल ‘याची देहि याची डोळा’ अनुभवली. देशाच्या दुसऱ्या चांद्रमोहिमेचा पहिला टप्पा यशस्वीपणे सर झाला आणि ‘चांद्रयान-२’ चंद्राच्या दिशेने मार्गस्थ झाले!
इस्रोच्या ‘जीएसएलव्ही मार्क ३’ने श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रावरून सोमवारी दुपारी दोन वाजून ४३ मिनिटांनी यशस्वी उड्डाण केले. उड्डाणानंतर १६ मिनिटे आणि १४ सेकंदांनी ‘चांद्रयान-२’ला पृथ्वीभोवती १६९ बाय ४५,४७५ किलोमीटरच्या दीर्घवर्तुळाकार कक्षेत प्रस्थापित करण्यात इस्रोच्या शास्त्रज्ञांना यश आले. ‘जीएसएलव्ही मार्क ३’ या अजस्र रॉकेटचे हे पहिलेच ‘ऑपरेशनल’ उड्डाण होते. ‘चांद्रयान-२’च्या रूपाने भारतीय भूमीवरून अवकाशात सर्वाधिक वजनाचे (३,८७२ किलो) प्रक्षेपण करण्याचाही विक्रम घडला.
सोमवारच्या प्रक्षेपणातून भारताच्या दुसऱ्या चांद्रमोहिमेचा पहिला टप्पा यशस्वीपणे पार पडला असून, आता ‘चांद्रयान-२’ला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवण्याचे आव्हान ‘इस्रो’समोर असणार आहे. पृथ्वीभोवतीच्या कक्षेत पोहोचल्यावर यानाचे सोलर पॅनेल स्वयंचलित पद्धतीने उघडले असून, ‘इस्रो टेलिमेट्री, ट्रॅकिंग अँड कमांड नेटवर्क’ने (इसट्रॅक) यानावर नियंत्रण मिळविले आहे. पुढील महिन्याभराच्या कालावधीमध्ये यानावर बसवण्यात आलेल्या इंधन यंत्रणेच्या मदतीने यानाची पृथ्वीभोवतीची कक्षा टप्प्याटप्प्याने वाढवून चंद्रापर्यंत नेण्यात येईल. त्यानंतर यानाला चंद्राभोवतीच्या कक्षेत प्रस्थापित करून, ‘विक्रम’ लँडर आणि ‘प्रज्ञान’ रोव्हरला ७ सप्टेंबरला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवण्यात येईल.