नवी दिल्ली
पुन्हा दहशतवादी हल्ला झाल्यास भारताचे 'सर्व पर्याय' खुले असल्याची माहिती केंद्र सरकारमधील सूत्रांनी दिलीय. तसंच दहशतवाद्यांच्या तळांवर पाकिस्तानने ठोस कारवाई करावी यासाठी भारताचे दबावतंत्र सुरूच राहील, असंही सांगण्यात आलंय.
पाकिस्तानने भारताविरोधात एफ-१६ लढाऊ विमानांचा वापर केल्याचे पुरावे अमेरिकेला देण्यात आलेत. या प्रकरणी आता अमेरिकेकडून चौकशी करण्यात येतेय. पाकव्याप्त काश्मीरमधील बालाकोट येथे दहशतवाद्यांच्या तळांवर हवाई दलाने बॉम्ब हल्ला केल्यानंतर भारताने पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय दबाव वाढवला आहे. वाढत्या दबावामुळे पाकिस्तानला दहशतवादाविरोधात कारवाई करावी लागेल, असं सूत्रांनी सांगितलं.
संयुक्त राष्ट्रांनी जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरवर बंदी घातल्यास पाकिस्तानची मोठी कोंडी होणार आहे. २६ फेब्रुवारीला पाकव्याप्त काश्मीरमधील बालाकोट येथे जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी तळावर बॉम्ब हल्ला केल्यानंतर हवाई दलाला अलर्टवर ठेण्यात आलंय. हवाई दलाच्या पश्चिम विभागातील सर्व तळांना सतर्कतेचा इशारा दिला गेलाय.
पुन्हा दहशतवादी हल्ला झाल्यास भारताचे 'सर्व पर्याय' खुले असल्याची माहिती केंद्र सरकारमधील सूत्रांनी दिलीय. तसंच दहशतवाद्यांच्या तळांवर पाकिस्तानने ठोस कारवाई करावी यासाठी भारताचे दबावतंत्र सुरूच राहील, असंही सांगण्यात आलंय.
पाकिस्तानने भारताविरोधात एफ-१६ लढाऊ विमानांचा वापर केल्याचे पुरावे अमेरिकेला देण्यात आलेत. या प्रकरणी आता अमेरिकेकडून चौकशी करण्यात येतेय. पाकव्याप्त काश्मीरमधील बालाकोट येथे दहशतवाद्यांच्या तळांवर हवाई दलाने बॉम्ब हल्ला केल्यानंतर भारताने पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय दबाव वाढवला आहे. वाढत्या दबावामुळे पाकिस्तानला दहशतवादाविरोधात कारवाई करावी लागेल, असं सूत्रांनी सांगितलं.
संयुक्त राष्ट्रांनी जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरवर बंदी घातल्यास पाकिस्तानची मोठी कोंडी होणार आहे. २६ फेब्रुवारीला पाकव्याप्त काश्मीरमधील बालाकोट येथे जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी तळावर बॉम्ब हल्ला केल्यानंतर हवाई दलाला अलर्टवर ठेण्यात आलंय. हवाई दलाच्या पश्चिम विभागातील सर्व तळांना सतर्कतेचा इशारा दिला गेलाय.