अ‍ॅपशहर

मल्ल्याचा ताबा द्या!: भारताची ब्रिटनकडे मागणी

देशातील बँकांचे ९ हजार कोटी बुडवून इंग्लंडला फरार झालेला उद्योगपती विजय मल्ल्या याला ताब्यात देण्याची मागणी भारत सरकारनं ब्रिटनकडं केली आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं ब्रिटनच्या दिल्लीतील उच्चायुक्तांना तसं लेखी निवेदनच दिलं आहे.

Maharashtra Times 28 Apr 2016, 7:21 pm
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम india writes to uk seeks vijay mallyas deportation
मल्ल्याचा ताबा द्या!: भारताची ब्रिटनकडे मागणी


देशातील बँकांचे ९ हजार कोटी बुडवून इंग्लंडला फरार झालेला उद्योगपती विजय मल्ल्या याला ताब्यात देण्याची मागणी भारत सरकारनं ब्रिटनकडं केली आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं ब्रिटनच्या दिल्लीतील उच्चायुक्तांना तसं लेखी निवेदनच दिलं आहे.

परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी आज ही माहिती दिली. मल्ल्यावर बँकांची कर्जे बुडविल्याचा तसंच, हवाला घोटाळ्याचा आरोप आहे. भारतातील चौकशी यंत्रणांनी वारंवार समन्स बजावूनही मल्ल्यानं चौकशीसाठी येणं टाळत आहे. त्यामुळं गेल्याच आठवड्यात त्याचा पासपोर्ट रद्द करण्यात आला असून त्याच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंटही बजावण्यात आलं आहे. त्यानंतरही मल्ल्या शरण न आल्यानं भारत सरकारनं थेट ब्रिटनशी संपर्क साधत मल्ल्याचा ताबा देण्याची विनंती केली आहे. ब्रिटनमधील भारतीय उच्चायुक्त या संदर्भातील एक निवेदन ब्रिटनच्या परराष्ट्र खात्यालाही देणार आहेत. मल्लावरील आरोप व त्याच्याविरोधात सुरू असलेल्या चौकशीचा तपशीलही ब्रिटन सरकारला देण्यात येणार आहे,' असं स्वरूप यांनी सांगितलं.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज