नवी दिल्ली: आपलंच एमआय १७ हेलिकॉप्टर चुकून पाडल्याप्रकरणी भारतीय हवाई दलानं आपल्या सहा अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यातील दोन अधिकाऱ्यांना कोर्ट मार्शलला सामोरं जावं लागणार आहे. १६ फेब्रुवारीला बालाकोट हवाई हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी पाकिस्ताननं भारतीय सैन्य दलाच्या कॅम्पवर हवाई हल्ल्याचा प्रयत्न केला होता. तो अपयशी ठरला होता. त्याच दिवशी भारतीय हवाई दलाच्या काही अधिकाऱ्यांनी आपलंच एक हेलिकॉप्टर पाडलं होतं. त्यात सहा अधिकारी शहीद झाले होते.
भारतीय हवाई दलाचंच हेलिकॉप्टर पाडल्याप्रकरणी दोन अधिकाऱ्यांना कोर्ट मार्शलला सामोरं जावं लागणार आहे. तर उर्वरित चार अधिकाऱ्यांना प्रशासकीय कारवाईला सामोरं लागणार आहे. एक ग्रुप कॅप्टन आणि एक विंग कमांडरला कोर्ट मार्शलला सामोरं जावं लागणार आहे, असं संरक्षण दलातील सूत्रांनी एका वृत्तसंस्थेला सांगितलं.
पाकिस्तानी हवाई दलानं फेब्रुवारीमध्ये भारतीय सैन्याच्या कॅम्पवर हल्ल्याचा प्रयत्न केला होता. तो प्रयत्न हवाई दलानं हाणून पाडला होता. त्याचवेळी श्रीनगरजवळ बडगाममध्ये भारतीय हवाई दलाचं एमआय १७ हे हेलिकॉप्टर कोसळलं होतं. त्यात असलेले सर्व सहा अधिकारी शहीद झाले होते. सुरुवातीला हा अपघात असल्याचं मानलं जात होतं. मात्र, श्रीनगरमध्ये तैनात आपल्याच दलातील अधिकाऱ्यांनी ते हेलिकॉप्टर पाडलं होतं, अशी माहिती समोर आली होती. २६ फेब्रुवारी रोजी बालाकोट हवाई हल्ल्यानंतर भारतीय हवाई सुरक्षा यंत्रणा हायअलर्टवर होती. हेलिकॉप्टर पाडण्याच्या दहा मिनिटे आधीच त्यानं उड्डाण केलं होतं.
पाकिस्तानच्या पाच बोटी जप्त
बोइंगच्या जुन्या विमानांना तडे
'ती' गंभीर चूक होती...
पाकिस्तानच्या हवाई दलाशी सामना करताना आपल्याच दलाचे एमआय १७ हे हेलिकॉप्टर चुकून पाडणे ही मोठी आणि गंभीर चूक होती, अशी कबुली अलीकडेच हवाई दल प्रमुख राकेश कुमार सिंह भदौरिया यांनी दिली होती. अशी चूक भविष्यात कधीच होणार नाही, अशी ग्वाही त्यांनी देशाला दिली होती. आमच्याच मिसाइलनं हेलिकॉप्टर पाडलं होतं. ते स्पष्ट झालं आहे. प्रशासकीय कारवाई करण्यात येत आहे. भविष्यात अशा घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आवश्यक पावले उचलली जात आहेत, असंही त्यांनी सांगितलं होतं.
भारतीय हवाई दलाचंच हेलिकॉप्टर पाडल्याप्रकरणी दोन अधिकाऱ्यांना कोर्ट मार्शलला सामोरं जावं लागणार आहे. तर उर्वरित चार अधिकाऱ्यांना प्रशासकीय कारवाईला सामोरं लागणार आहे. एक ग्रुप कॅप्टन आणि एक विंग कमांडरला कोर्ट मार्शलला सामोरं जावं लागणार आहे, असं संरक्षण दलातील सूत्रांनी एका वृत्तसंस्थेला सांगितलं.
पाकिस्तानी हवाई दलानं फेब्रुवारीमध्ये भारतीय सैन्याच्या कॅम्पवर हल्ल्याचा प्रयत्न केला होता. तो प्रयत्न हवाई दलानं हाणून पाडला होता. त्याचवेळी श्रीनगरजवळ बडगाममध्ये भारतीय हवाई दलाचं एमआय १७ हे हेलिकॉप्टर कोसळलं होतं. त्यात असलेले सर्व सहा अधिकारी शहीद झाले होते. सुरुवातीला हा अपघात असल्याचं मानलं जात होतं. मात्र, श्रीनगरमध्ये तैनात आपल्याच दलातील अधिकाऱ्यांनी ते हेलिकॉप्टर पाडलं होतं, अशी माहिती समोर आली होती. २६ फेब्रुवारी रोजी बालाकोट हवाई हल्ल्यानंतर भारतीय हवाई सुरक्षा यंत्रणा हायअलर्टवर होती. हेलिकॉप्टर पाडण्याच्या दहा मिनिटे आधीच त्यानं उड्डाण केलं होतं.
पाकिस्तानच्या पाच बोटी जप्त
बोइंगच्या जुन्या विमानांना तडे
'ती' गंभीर चूक होती...
पाकिस्तानच्या हवाई दलाशी सामना करताना आपल्याच दलाचे एमआय १७ हे हेलिकॉप्टर चुकून पाडणे ही मोठी आणि गंभीर चूक होती, अशी कबुली अलीकडेच हवाई दल प्रमुख राकेश कुमार सिंह भदौरिया यांनी दिली होती. अशी चूक भविष्यात कधीच होणार नाही, अशी ग्वाही त्यांनी देशाला दिली होती. आमच्याच मिसाइलनं हेलिकॉप्टर पाडलं होतं. ते स्पष्ट झालं आहे. प्रशासकीय कारवाई करण्यात येत आहे. भविष्यात अशा घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आवश्यक पावले उचलली जात आहेत, असंही त्यांनी सांगितलं होतं.