अ‍ॅपशहर

भारतीय सैन्याने केल्या पाकिस्तानच्या सात चौक्या उद्धवस्त

सोमवारी पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्यानंतर भारतीय सैन्याने आज जोरदार प्रत्युत्तर देत पाकिस्तान सैन्याच्या सात चौक्या उद्ध्वस्त केल्या आहेत. या गोळीबारात पाक सैन्यातील बरेच जवान ठार झाले असल्याचा अंदाज सुरक्षादलाने वर्तवला जातो आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 2 Apr 2019, 4:16 pm
श्रीनगर:
महाराष्ट्र टाइम्स.कॉम indian army destroys seven posts of pak army
भारतीय सैन्याने केल्या पाकिस्तानच्या सात चौक्या उद्धवस्त


सोमवारी पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्यानंतर भारतीय सैन्याने आज जोरदार प्रत्युत्तर देत पाकिस्तान सैन्याच्या सात चौक्या उद्ध्वस्त केल्या आहेत. या गोळीबारात पाक सैन्यातील बरेच जवान ठार झाले असल्याचा अंदाज सुरक्षादलाने वर्तवला जातो आहे.


सोमवारी सकाळी शस्त्रसंधीचे उल्लंघन करत राजौरी आणि पुँछ भागामध्ये पाकिस्तानी सैन्याने जोरदार गोळीबार केला. या गोळीबारात एक पाच वर्षांची चिमुरडी आणि बीएसएफचा जवान ठार झाले. या हल्ल्यानंतर राजौरी , पुंछ भागातील अनेक शाळा, महाविद्यालयं काही काळासाठी बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले.


आज सकाळपर्यंत पुँछ ,नौशेरा, शहापूर सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून जोरदार गोळीबार सुरू होता. त्यानंतर मात्र भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली. पाक व्याप्त काश्मीरमधील चौक्यांवर भारतीय सैन्याने जोरदार मॉर्टर शेलिंग केलं. रखचिक्री आणि रावलकोटे सेक्टरमधील सात चौक्या भारतीय सैन्याने पूर्णपणे उद्ध्वस्त केल्या.


या गोळीबारात आतापर्यंत पाक सैन्याचे तीन जवान ठार झाले असल्याची माहिती पाक सरकारच्या आयएसपीआर या संस्थेने दिली आहे. तर मृतांचा आकडा याहून कितीतरी अधिक आहे असं भारतीय सुरक्षादलाच्या सूत्रांनी सांगितलं आहे. या गोळीबारामुळे पाकिस्ताननेही स्थानिकांना घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज