नवी दिल्ली
भारतीय लष्कराने आपले सामर्थ्य वाढवण्याची जोरदार तयारी सुरू केली आहे. जवळपास १३ लाख सैनिकांचा फौजफाटा असलेल्या भारतीय लष्कराने आता शस्त्रसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ करण्यास सुरुवात केली आहे. यात विविध रॉकेट्स, मिसाइल्सपासून अत्याधुनिक टँक आणि आर्टिलरी शेल्सचा समावेश आहे.
येत्या काळात भयानक स्वरुपाचं युद्ध झाल्यास लागोपाठ १० दिवस पुरेल इतका शस्त्रसाठा सध्या भारतीय लष्कराकडे आहे. शस्त्रसाठ्याच्या पुरवठ्याची ही क्षमता ४० दिवसांपर्यंत नेण्याचं लक्ष्य भारतीय लष्कराने ठेवलं आहे. २०२२-१३ पर्यंत भारतीय लष्कराला मजबूत करण्याच्या दृष्टीकोनातून ही पावलं उचलली जात आहेत.
चीन आणि पाकिस्तानच्या आव्हानाला समोर ठेवून तयारी
संरक्षण मंत्रालयातील सुत्रांच्या माहितीनुसार, युद्धाजन्य परिस्थिती उद्भवल्यास भारतीय लष्कराकडे १०(i) स्तरावर विविध पद्धतीची शस्त्रास्त्रे पुरविण्यात येतील. म्हणजेच युद्ध झाल्यास १० दिवस अविरत शस्त्रसाठ्याचा पुरवठा करता येईल अशी तयारी असणे. मुख्यत्वे, लष्कराची ही तयारी पश्चिमेकडील सीमेसाठी होत आहे. पण शस्त्रसाठ्याची जमवाजमव ही पाकिस्तान आणि चीन अशा दोन्ही देशांना समोर ठेवून करण्याची गरज आहे. शस्त्रसाठ्याच्या तयारीसाठी जवळपास १२ हजार ८९० कोटी रुपयांचे २४ करार प्रस्तावित आहेत. यात एकूण १९ परदेशी कंपन्यांसोबत केलेल्या करारांचा समावेश आहे.
...तेव्हाच ताकद वाढेल
भारतीय लष्कराने पुढील उद्दीष्ट हे ४० (i) इतके आहे. म्हणजेच युद्ध काळात सलग ४० दिवस पुरेल इतका शस्त्रसाठ्याची क्षमता ठेवणे. यासाठी २०२२ नंतर पुढील १० वर्षांसाठी स्वदेशी कंपन्यांचे विविध परदेशी कंपन्यांसोबत भागीदारी करून विविध पद्धतीचे लष्करी टँक आणि इतर शस्त्रास्त्र निर्मिती करण्यासाठी देशाला सक्षम करण्याचा मानस संरक्षण मंत्रालयाचा आहे. यात वार्षिक १,७०० कोटी रुपयांचा खर्च होण्याचा अंदाज आहे.
उरी हल्ल्यानंतर सरकारला जाग
गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय लष्करातील टँकपासून एअर डिफेन्स युनिटच्या कमतरतेसंबंधी अनेक सवाल उपस्थित केले गेले आहेत. २०१६ सालच्या उरी हल्ल्यानंतर सरकार खडबडून जागे झाले आणि तिन्ही सैन्य दलांना वित्तीय अधिकार देण्यात आले. सैन्याकडे आवश्यक शस्त्रसाठा नसल्याची बाब समोर आल्यानंतर त्वरित १०(i) स्तरावर करार केले गेले आणि जवळपास शस्त्रांपासून ते टँकच्या इंजिनापर्यंत एकूण २४ हजार कोटी रुपयांचे करार अस्तित्वात आले. यात स्मर्च रॉकेट, अँटी-टँक गायडेड मिसाईल, १२५ एमएम एपीएफएसडीएस आणि इतर अत्याधुनिक शस्त्रांसाठी रशिया व इतर देशांसोबत करार केले गेले.
भारतीय लष्कराने आपले सामर्थ्य वाढवण्याची जोरदार तयारी सुरू केली आहे. जवळपास १३ लाख सैनिकांचा फौजफाटा असलेल्या भारतीय लष्कराने आता शस्त्रसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ करण्यास सुरुवात केली आहे. यात विविध रॉकेट्स, मिसाइल्सपासून अत्याधुनिक टँक आणि आर्टिलरी शेल्सचा समावेश आहे.
येत्या काळात भयानक स्वरुपाचं युद्ध झाल्यास लागोपाठ १० दिवस पुरेल इतका शस्त्रसाठा सध्या भारतीय लष्कराकडे आहे. शस्त्रसाठ्याच्या पुरवठ्याची ही क्षमता ४० दिवसांपर्यंत नेण्याचं लक्ष्य भारतीय लष्कराने ठेवलं आहे. २०२२-१३ पर्यंत भारतीय लष्कराला मजबूत करण्याच्या दृष्टीकोनातून ही पावलं उचलली जात आहेत.
चीन आणि पाकिस्तानच्या आव्हानाला समोर ठेवून तयारी
संरक्षण मंत्रालयातील सुत्रांच्या माहितीनुसार, युद्धाजन्य परिस्थिती उद्भवल्यास भारतीय लष्कराकडे १०(i) स्तरावर विविध पद्धतीची शस्त्रास्त्रे पुरविण्यात येतील. म्हणजेच युद्ध झाल्यास १० दिवस अविरत शस्त्रसाठ्याचा पुरवठा करता येईल अशी तयारी असणे. मुख्यत्वे, लष्कराची ही तयारी पश्चिमेकडील सीमेसाठी होत आहे. पण शस्त्रसाठ्याची जमवाजमव ही पाकिस्तान आणि चीन अशा दोन्ही देशांना समोर ठेवून करण्याची गरज आहे. शस्त्रसाठ्याच्या तयारीसाठी जवळपास १२ हजार ८९० कोटी रुपयांचे २४ करार प्रस्तावित आहेत. यात एकूण १९ परदेशी कंपन्यांसोबत केलेल्या करारांचा समावेश आहे.
...तेव्हाच ताकद वाढेल
भारतीय लष्कराने पुढील उद्दीष्ट हे ४० (i) इतके आहे. म्हणजेच युद्ध काळात सलग ४० दिवस पुरेल इतका शस्त्रसाठ्याची क्षमता ठेवणे. यासाठी २०२२ नंतर पुढील १० वर्षांसाठी स्वदेशी कंपन्यांचे विविध परदेशी कंपन्यांसोबत भागीदारी करून विविध पद्धतीचे लष्करी टँक आणि इतर शस्त्रास्त्र निर्मिती करण्यासाठी देशाला सक्षम करण्याचा मानस संरक्षण मंत्रालयाचा आहे. यात वार्षिक १,७०० कोटी रुपयांचा खर्च होण्याचा अंदाज आहे.
उरी हल्ल्यानंतर सरकारला जाग
गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय लष्करातील टँकपासून एअर डिफेन्स युनिटच्या कमतरतेसंबंधी अनेक सवाल उपस्थित केले गेले आहेत. २०१६ सालच्या उरी हल्ल्यानंतर सरकार खडबडून जागे झाले आणि तिन्ही सैन्य दलांना वित्तीय अधिकार देण्यात आले. सैन्याकडे आवश्यक शस्त्रसाठा नसल्याची बाब समोर आल्यानंतर त्वरित १०(i) स्तरावर करार केले गेले आणि जवळपास शस्त्रांपासून ते टँकच्या इंजिनापर्यंत एकूण २४ हजार कोटी रुपयांचे करार अस्तित्वात आले. यात स्मर्च रॉकेट, अँटी-टँक गायडेड मिसाईल, १२५ एमएम एपीएफएसडीएस आणि इतर अत्याधुनिक शस्त्रांसाठी रशिया व इतर देशांसोबत करार केले गेले.