नवी दिल्ली:
भारतीय हवाई दलानं पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर केलेल्या एअर स्ट्राइकनंतर काही तासांतच भारतीय लष्करानं एक कविता ट्विट केली आहे. 'ताकद आणि विजयाचा विश्वास असलेल्यांनाच शांतता मिळू शकते,' असं या कवितेच्या माध्यमातून लष्करानं सुचवलं आहे.
लष्करानं ट्विट केलेली ही कविता सुप्रसिद्ध हिंदी कवी रामधारी सिंह 'दिनकर' यांची आहे. 'शक्ती और क्षमा' असं या कवितेचं शीर्षक आहे. 'शत्रूसमोर तुम्ही नम्र आणि सौम्य राहिलात की तो तुम्हाला भेकड समजू लागतो. कौरवांनीही पांडवांना अशीच वागणूक दिली होती,' असा या कवितेचा भावार्थ आहे. लष्कराची ही कविता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
भारतीय हवाई दलानं पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर केलेल्या एअर स्ट्राइकनंतर काही तासांतच भारतीय लष्करानं एक कविता ट्विट केली आहे. 'ताकद आणि विजयाचा विश्वास असलेल्यांनाच शांतता मिळू शकते,' असं या कवितेच्या माध्यमातून लष्करानं सुचवलं आहे.
लष्करानं ट्विट केलेली ही कविता सुप्रसिद्ध हिंदी कवी रामधारी सिंह 'दिनकर' यांची आहे. 'शक्ती और क्षमा' असं या कवितेचं शीर्षक आहे. 'शत्रूसमोर तुम्ही नम्र आणि सौम्य राहिलात की तो तुम्हाला भेकड समजू लागतो. कौरवांनीही पांडवांना अशीच वागणूक दिली होती,' असा या कवितेचा भावार्थ आहे. लष्कराची ही कविता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.