अ‍ॅपशहर

ind vs pak: 'याद राखा...', पाक अधिकाऱ्यांनी धमकावले होते!

भारत आणि पाकिस्तानदरम्यान झालेल्या हवाई हल्ल्यांनंतर आयएसआयने भारताचे उच्चायुक्त आणि इतर अधिकाऱ्यांनी अतिशय त्रास दिल्याचे स्पष्ट होत आहे. एक आयएसआयच्या अधिकाऱ्याने तर भारतीय अधिकाऱ्यांना धमकीच दिली होती. 'आमच्याशी चांगला व्यावहार करा, ...तुमचे दोन लोक आमच्या ताब्यात आहेत, हे ध्यानात ठेवा', असे त्यांनी म्हटले होते.

Sachin Parashar | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 7 Mar 2019, 1:35 pm
नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम pakistan-behaves-badly-maha


भारत आणि पाकिस्तानदरम्यान झालेल्या हवाई हल्ल्यांनंतर दुसऱ्याच दिवशी पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी भारतीय उच्चायुक्तांशी गैरवर्तन केल्याचे स्पष्ट होत आहे. २७ फेब्रुवारीला भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्तमान यांनी पाकिस्तानचे एफ-१६ हे विमान पाडले, त्यानंतर पाकिस्तानने त्यांना आपल्या ताब्यात घेतले होते. त्यावेळी आयएसआयने भारताचे उच्चायुक्त आणि इतर अधिकाऱ्यांना अतिशय त्रास दिला होता. एक आयएसआयच्या अधिकाऱ्याने तर भारतीय अधिकाऱ्यांना धमकीच दिली होती. 'आमच्याशी चांगला व्यावहार करा, ...तुमचे दोन लोक आमच्या ताब्यात आहेत, हे ध्यानात ठेवा', असे त्यांनी म्हटले होते.

दरम्यानच्या काळात पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी भारतीय अधिकाऱ्यांच्या कार रोखण्याचा प्रयत्न केला. २८ फेब्रुवारीला भारतीय उच्चायुक्तांच्या कार जलद गतीने जात असताना पाक सुरक्षा अधिकाऱ्यांनी मध्येच रोखल्या होत्या. अभिनंदन यांना पाकने ताब्यात घेतल्यानंतर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने कठोर शब्दात आक्षेप नोंदवला होता. याच्या उत्तरादाखल आयएसआयच्या एका अधिकाऱ्याने कठोर शब्दांत म्हटले होते, 'आम्ही तुमच्या दोन लोकांना पकडले आहे, तरी देखील तुम्ही आम्हाला अडचणीत आणू पाहत आहात... इतके सारे घडून देखील तुम्ही आदराने वागत नाही आहात.'

२७ फेब्रुवारीला पाकिस्तानने भारताची दोन लढाऊ विमाने पाडून २ वैमानिकांना ताब्यात घेतल्याचा दावा केला होता. नंतर पाकिस्तानने आपल्या दाव्यापासून घुमजाव केले. आम्ही भारताचे एकच विमान पाडले असून एका वैमानिकाला ताब्यात घेतले आहे, असे पाकने नंतर स्पष्ट केले होते.

भारतीय अधिकाऱ्यांच्या कारचा केला पाठलाग

आयएसआयच्या अधिकाऱ्यांनी ज्या दिवशी भारतीय अधिकाऱ्यांशी गैरवर्तन केले, त्याच दिवशी भारतीय अधिकाऱ्यांना त्रास देण्याच्या आणखी काही घटना पुढे आल्या आहेत. त्यांपैकी एक म्हणजे दोन भारतीय अधिकाऱ्यांच्या कारचा बळजबरीने पाठलाग करून त्यांचे फोटो घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. तर खरेदीसाठी गेलेल्या आणखी एका भारतीय अधिकाऱ्याचा आयएसआयने पाठलाग केल्याचेही स्पष्ट झाले आहे. या अधिकाऱ्यांचा बाइकने १० मीटरचे अंतर ठेवून पाठलाग करण्यात आला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज