अ‍ॅपशहर

india taliban news : भारताचा तालिबानला स्पष्ट संदेश! परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते म्हणाले...

भारताने तालिबानला आज स्पष्ट संदेश दिला आहे. अफगाणिस्तानच्या भूमीचा दुरुपयोग दहशतवादी कारवायांसाठी होऊ नये, असं भारताने म्हटलं आहे. तसंच अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीयांनाही मायदेशी आणलं जाईल, असं परराष्ट्र मंत्रालयाने सांगितलं.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 2 Sep 2021, 7:38 pm
नवी दिल्लीः अफगाणिस्तानच्या भूमीचा उपयोग हा कुठल्याही प्रकारच्या दहशतवादी ( India Taliban Afghanistan ) कारवायांसठी केला जाऊ नये, असं भारताने तालिबानला बजावलं आहे. तालिबानशी चर्चा होणार की नाही? याचं उत्तर हो किंवा नाही, असं देता येणार नाही. अफगाणिस्तानच्या भूमीवरून कुठल्याही प्रकारच्या दहशतवादी कारवाया होऊ नये, हा आमचा उद्देश असल्याचं परराष्ट्र मंत्रालयाचे ( Ministry Of External Affairs ) प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम indias immediate focus is to ensure that afghan soil is not used for terrorist activities directed against it says mea
भारताचा तालिबानला स्पष्ट संदेश! 'अफगाणिस्तानच्या भूमीचा दुरुपयोग दहशतवादी कारवायांसाठी होऊ नये'


अफगाणिस्तानमध्ये कसे सरकार स्थापन होईल, याबाबत आमच्याकडे कुठलीही विस्तृत माहिती नाही. तसंच तालिबानसोबत पुढील बैठकीबाबत आपल्याला कुठलीही अपडेट नाही. यावर हो कींवा नाही असं उत्तर देता येणार नाही, असं बागची म्हणाले.

अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशात आणण्याबाबत बागची यांना प्रश्न केला गेला. काबुल विमानतळावरील विमान वाहतूक बंद आहे. पण अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या बहुतेक भारतीयांना मायदेशात आणण्यात आलं आहे. पण विमान वाहतूक सुरू होताच काबुलमधून तिथे अडकलेल्या भारतीयांना मायदेशात आणण्यासाठी पुन्हा मोहीम राबवली जाईल, असं बागची यांनी सांगितलं.

भारताने मंगळवारी तालिबानच्या नेत्यासोबत पहिली औपचारीक चर्चा केली. कतारमधील दोहा येथे भारताचे राजदूत आणि तालिबानच्या नेत्यांमध्ये चर्चा झाली. कतारमधील भारताचे राजदूत दीपक मित्तल आणि तालिबानच्या राजनैतीक कार्यालयाचा प्रमुख शेर मोहम्मद अब्बास स्टेनकझई यांच्यात चर्चा झाली.

naseeruddin shah : तालिबानचा उत्सव साजरा करणाऱ्या भारतीय मुस्लिमांना नसिरुद्दीन शाहांचा कडक संदेश

तालिबानकडून सकारात्मक प्रतिसादः बागची

भारतीय राजदुतांची दोहामध्ये तालिबानच्या नेत्याशी सकारात्मक चर्चा झाली. तालिबानकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे, असं बागची म्हणाले. तालिबानला मान्यता देणार का? असा प्रश्न बागची यांना विचारण्या आला. तालिबानच्या नेत्यासोबत ही पहिलीच औपचारीक चर्चा होती. यामुळे यावर आताच बोलणं अतिशय घाईचं ठरेल. ही सुरवातीचे दिवस आहेत, असं उत्तर त्यांनी दिलं. तालिबानसोबत आता पुढील बैठक कधी होईल, याबाबत सांगता येणार नाही. आपल्याकडे यासंदर्भात कुठलीही अपडेट नाही, असं अरिंदम बागची म्हणाले.

ISIS-K भारतातील 'इसिस'कडून भारतात दहशतवादी हल्ल्याची शक्यता, सुरक्षा यंत्रणा अलर्टवर

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज