चीनच्या हवाई गस्तीला भारताचे प्रत्युत्तर
दिसली. त्यानंतर भारताच्या सुखोई-३० बनावटीच्या लढाऊ विमानांनीही याच भागातील भारतीय हवाई हद्दीत गस्त घालण्यास सुरुवात केली. चीनच्या प्रत्युत्तर देण्याचाच भारताचा हा पवित्रा होता. 'सीमेजवळ चीनची लढाऊ हेलिकॉप्टर त्यांच्याच हवाई हद्दीमध्ये घिरट्या घालत होती आणि आपली लढाऊ विमाने ही भारतीय हद्दीमध्ये उडत होती. असे प्रकार नेहमीच घडतात. नवीन काहीही नाही,' असा खुलासा हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी केला. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर दोन्ही देशांकडून आक्रमक भूमिका घेतली जात आहे का, या प्रश्नावर त्यांनी नकारार्थी उत्तर दिले. 'अशा पद्धतीने नेहमीच्या गोष्टींना विनाकारण सनसनाटी स्वरूप देणे योग्य नाही. ही नेहमीच्याच प्रक्रियेला विनाकारण वेगळे रूप देण्याची आवश्यकता नाही,' असेही हवाई दलातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.