ईटी वृत्त, नवी दिल्ली
भारत-पाकिस्तान संबंधांमध्ये अण्वस्त्रांमुळे वाढलेले तणाव किती टोकाला गेले होते, हे आता उघड झाले आहे. पाकिस्तानच्या काहुटा शहरातील अणू प्रकल्प असलेले ठिकाण बॉम्ब टाकून उडवून देण्याचा भारताचा कट होता, असे जाहीर केलेल्या कागदपत्रांतून समोर आले आहे.
अमेरिकेच्या ‘सेंट्रल इंटिलिजन्स एजन्सी’ने (सीआयए) त्यांच्या वेबसाइटवर सुमारे ९ लाख ३० हजार गुपित कागदपत्रे जाहीर केली आहेत. १९८०च्या दशकात पाकिस्तानच्या अणू कार्यक्रमावर भारतामध्ये वाढती चिंता होती, असे यामध्ये म्हटले आहे. उघड झालेल्या एका कागदपत्रामध्ये भारताने पाकिस्तानच्या काहुटा शहरातील अणुप्रकल्पावर हल्ला करण्याची योजना आखली होती. छुपी अशी ही मोहीम होती. आंतरराष्ट्रीय दबावामुळे भारताला ही मोहीम राबवता मात्र आली नाही.
अमेरिकेने प्रसिद्ध केलेल्या गुपित कागदपत्रांनुसार, कहुटामध्ये पकिस्तानच्या अणुप्रकल्प उद्ध्वस्त करण्याची भारताची योजना होती. इराकमध्ये सुरू असलेला अणुप्रकल्प इस्रायलने उद्ध्वस्त केला होता, त्या धर्तीवर ही योजना होती. इस्रायलच्या विमानांनी इराकमध्ये घुसून अणुप्रकल्पावर हल्ला केला होता आणि पुन्हा ही विमाने इस्रायलमध्ये सुरक्षितरीत्या परतली. पाकिस्तान हा शेजारी देश असल्याने इस्रायलच्या इराक हल्ल्याच्या तुलनेत भारतासाठी पाकिस्तानमध्ये हल्ला करणे तुलनेने सोपे होते. पण, असा हल्ला केला, तर अणुयुद्धाची शक्यता होती. इस्रायलने ७ जून १९८१ रोजी ऑपरेशन ऑपेरा अंतर्गत इराकच्या अणुप्रकल्पावर हल्ला केला होता. अमेरिकेच्या पाकिस्तानमधील तत्कालीन राजदूतांनी अध्यक्ष रोनाल्ड रेगन यांनी जनरल झिया उल हक यांना भारताच्या संभाव्य हल्ल्याची कल्पना दिली होती. तत्कालीन सोव्हिएत रशियालाही या हल्ल्याची माहिती होती. ‘वॉशिंग्टन पोस्ट’मध्ये १९८२मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका लेखामध्ये भारतीय लष्कराने पंतप्रधान इंदिरा गांधी यांना पाकिस्तानच्या अणुप्रकल्पांना लक्ष्य करण्याची सूचना केली होती. मार्च १९८४मध्ये इंदिरा गांधी यांनी हल्ला करून अणुप्रकल्प उद्ध्वस्त करण्यास मंजुरी दिली. पण, अमेरिकेचे अध्यक्ष रोनाल्ड रेगन यांनी कारवाई करण्याची धमकी दिल्यामुळे इंदिरा गांधी यांनी उचललेले पाऊल मागे घेतले. या हल्ल्याची अमेरिकेच्या प्रसारमाध्यमांतून चर्चा झाली. सीआयएनेही भारताच्या संभाव्य हल्ल्याची कल्पना दिली. त्यानंतर पाकिस्तानने कहुटा अणुप्रकल्पाभोवती हवाई सुरक्षा यंत्रणा वाढवली. भारताला पाकिस्तानवर अचानक हल्ला करायचा होता. मात्र, आधीच खूप चर्चा झाल्याने भारताला हल्ल्याचे नियोजन गुंडाळून ठेवणे भाग पडले.
चाचणीची तयारी
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या कार्यकाळात १९८५मध्ये भारताने हायड्रोजन बॉम्बच्या चाचणीची तयारी केली होती. पाकिस्तानच्या अणुप्रकल्पाला उत्तर म्हणून ही तयारी होती. भारताची सुरक्षा यंत्रणा अतिशय कडक असल्याने भारताच्या अणुप्रकल्पांबाबत माहिती गोळा करणे फार अडचणीचे होत होते, असेही सीआयएने दिली आहे. १९७४मध्ये केलेल्या चाचणीपेक्षा मोठी चाचणी ८५मध्ये होणार होती. मुंबईतील भाभा अणू संशोधन केंद्रात भारताने हायड्रोजन बॉम्ब तयार केला असल्याची माहिती सीआयएने दिली. मात्र, आंतरराष्ट्रीय दबावामुळे भारताने ही चाचणी केली नाही. भारताला चीनपासून दीर्घकालीन धोका होता. पाकिस्तान नव्हे, असे कागदपत्रांत नमूद केले आहे.
भारत-पाकिस्तान संबंधांमध्ये अण्वस्त्रांमुळे वाढलेले तणाव किती टोकाला गेले होते, हे आता उघड झाले आहे. पाकिस्तानच्या काहुटा शहरातील अणू प्रकल्प असलेले ठिकाण बॉम्ब टाकून उडवून देण्याचा भारताचा कट होता, असे जाहीर केलेल्या कागदपत्रांतून समोर आले आहे.
अमेरिकेच्या ‘सेंट्रल इंटिलिजन्स एजन्सी’ने (सीआयए) त्यांच्या वेबसाइटवर सुमारे ९ लाख ३० हजार गुपित कागदपत्रे जाहीर केली आहेत. १९८०च्या दशकात पाकिस्तानच्या अणू कार्यक्रमावर भारतामध्ये वाढती चिंता होती, असे यामध्ये म्हटले आहे. उघड झालेल्या एका कागदपत्रामध्ये भारताने पाकिस्तानच्या काहुटा शहरातील अणुप्रकल्पावर हल्ला करण्याची योजना आखली होती. छुपी अशी ही मोहीम होती. आंतरराष्ट्रीय दबावामुळे भारताला ही मोहीम राबवता मात्र आली नाही.
अमेरिकेने प्रसिद्ध केलेल्या गुपित कागदपत्रांनुसार, कहुटामध्ये पकिस्तानच्या अणुप्रकल्प उद्ध्वस्त करण्याची भारताची योजना होती. इराकमध्ये सुरू असलेला अणुप्रकल्प इस्रायलने उद्ध्वस्त केला होता, त्या धर्तीवर ही योजना होती. इस्रायलच्या विमानांनी इराकमध्ये घुसून अणुप्रकल्पावर हल्ला केला होता आणि पुन्हा ही विमाने इस्रायलमध्ये सुरक्षितरीत्या परतली. पाकिस्तान हा शेजारी देश असल्याने इस्रायलच्या इराक हल्ल्याच्या तुलनेत भारतासाठी पाकिस्तानमध्ये हल्ला करणे तुलनेने सोपे होते. पण, असा हल्ला केला, तर अणुयुद्धाची शक्यता होती. इस्रायलने ७ जून १९८१ रोजी ऑपरेशन ऑपेरा अंतर्गत इराकच्या अणुप्रकल्पावर हल्ला केला होता. अमेरिकेच्या पाकिस्तानमधील तत्कालीन राजदूतांनी अध्यक्ष रोनाल्ड रेगन यांनी जनरल झिया उल हक यांना भारताच्या संभाव्य हल्ल्याची कल्पना दिली होती. तत्कालीन सोव्हिएत रशियालाही या हल्ल्याची माहिती होती. ‘वॉशिंग्टन पोस्ट’मध्ये १९८२मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका लेखामध्ये भारतीय लष्कराने पंतप्रधान इंदिरा गांधी यांना पाकिस्तानच्या अणुप्रकल्पांना लक्ष्य करण्याची सूचना केली होती. मार्च १९८४मध्ये इंदिरा गांधी यांनी हल्ला करून अणुप्रकल्प उद्ध्वस्त करण्यास मंजुरी दिली. पण, अमेरिकेचे अध्यक्ष रोनाल्ड रेगन यांनी कारवाई करण्याची धमकी दिल्यामुळे इंदिरा गांधी यांनी उचललेले पाऊल मागे घेतले. या हल्ल्याची अमेरिकेच्या प्रसारमाध्यमांतून चर्चा झाली. सीआयएनेही भारताच्या संभाव्य हल्ल्याची कल्पना दिली. त्यानंतर पाकिस्तानने कहुटा अणुप्रकल्पाभोवती हवाई सुरक्षा यंत्रणा वाढवली. भारताला पाकिस्तानवर अचानक हल्ला करायचा होता. मात्र, आधीच खूप चर्चा झाल्याने भारताला हल्ल्याचे नियोजन गुंडाळून ठेवणे भाग पडले.
चाचणीची तयारी
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या कार्यकाळात १९८५मध्ये भारताने हायड्रोजन बॉम्बच्या चाचणीची तयारी केली होती. पाकिस्तानच्या अणुप्रकल्पाला उत्तर म्हणून ही तयारी होती. भारताची सुरक्षा यंत्रणा अतिशय कडक असल्याने भारताच्या अणुप्रकल्पांबाबत माहिती गोळा करणे फार अडचणीचे होत होते, असेही सीआयएने दिली आहे. १९७४मध्ये केलेल्या चाचणीपेक्षा मोठी चाचणी ८५मध्ये होणार होती. मुंबईतील भाभा अणू संशोधन केंद्रात भारताने हायड्रोजन बॉम्ब तयार केला असल्याची माहिती सीआयएने दिली. मात्र, आंतरराष्ट्रीय दबावामुळे भारताने ही चाचणी केली नाही. भारताला चीनपासून दीर्घकालीन धोका होता. पाकिस्तान नव्हे, असे कागदपत्रांत नमूद केले आहे.