जम्मू: गेले अनेक दिवस सीमेपलीकडून बेछूट गोळीबार आणि तोफहल्ले करणाऱ्या पाकिस्तानने सोमवारीही जम्मू-काश्मीरमधील अखनूर भागांमध्ये भारताच्या लष्करी चौक्यांवर गोळीबार, तोफांचा मारा केला. मात्र, या हल्ल्यांमध्ये कोणतीही हानी झाल्याचे वृत्त नाही. पाकच्या माऱ्याला भारतानेही तोडीस तोड प्रत्युत्तर दिले.
दुसरीकडे शोपियान आणि पुलवामा येथे दहशतवाद्यांच्या ग्रेनेडहल्ल्याच्या दोन घटनांमध्ये ८ सुरक्षा जवानांसह २३ जण जखमी झाले.
दुसरीकडे शोपियान आणि पुलवामा येथे दहशतवाद्यांच्या ग्रेनेडहल्ल्याच्या दोन घटनांमध्ये ८ सुरक्षा जवानांसह २३ जण जखमी झाले.