नवी दिल्ली: राजधानी दिल्ली आणि आर्थिक राजधानी मुंबईत 'जैश-ए-मोहम्मद' ही दहशतवादी संघटना हल्ल्याच्या तयारीत असल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांच्या हाती आली आहे. जैशचा दहशतवादी इब्राहिम असगर यांनी हल्ल्याचा कट रचला असल्याची माहिती यंत्रणांना मिळाली आहे. सुरक्षा यंत्रणांनी दिल्ली आणि मुंबईला सतर्कतेचा इशारा दिला आहे. इब्राहिम असगर हा 'जैश-ए-मोहम्मद'चा प्रमुख मसूद अजहरचा भाऊ आहे.
काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे राज्यघटनेतील कलम ३७० हटवण्याच्या निर्णयानंतर येत्या १५ ऑगस्ट या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी जैश हा हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांच्या हाती लागली आहे. येत्या स्वातंत्र्यदिनाला देशातील सर्व प्रमुख शहरांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
काश्मीरमधील परिस्थिती नियंत्रणात
काश्मीरमधील सुरक्षाव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे स्वत: काश्मिरात दाखल झाले आहेत. शोपियां आणि दक्षिण काश्मीरच्या भागांवर दहशतवादाचे सावट आहे. सूत्रांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीनुसार, २०१६ मध्ये बुरहान वानी ठार झाल्यानंतर काश्मीरच्या दक्षिण भागात हिंसेच्या घटना घडलेल्या आहेत. मात्र,सध्या हे संपूर्ण क्षेत्र नियंत्रणात आहे.
परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचे आदेश देतानाच डोवाल यांनी या सर्व भागांमध्ये अन्नधान्य आणि गरजेच्या वस्तूंची कमरता होता कामा नये, अशा सूचनाही केल्या आहेत. तेथील परिस्थिती नियंत्रणात राहावी यासाठी विशेष काळजी घेण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या आहेत
काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे राज्यघटनेतील कलम ३७० हटवण्याच्या निर्णयानंतर येत्या १५ ऑगस्ट या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी जैश हा हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांच्या हाती लागली आहे. येत्या स्वातंत्र्यदिनाला देशातील सर्व प्रमुख शहरांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
काश्मीरमधील परिस्थिती नियंत्रणात
काश्मीरमधील सुरक्षाव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे स्वत: काश्मिरात दाखल झाले आहेत. शोपियां आणि दक्षिण काश्मीरच्या भागांवर दहशतवादाचे सावट आहे. सूत्रांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीनुसार, २०१६ मध्ये बुरहान वानी ठार झाल्यानंतर काश्मीरच्या दक्षिण भागात हिंसेच्या घटना घडलेल्या आहेत. मात्र,सध्या हे संपूर्ण क्षेत्र नियंत्रणात आहे.
परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचे आदेश देतानाच डोवाल यांनी या सर्व भागांमध्ये अन्नधान्य आणि गरजेच्या वस्तूंची कमरता होता कामा नये, अशा सूचनाही केल्या आहेत. तेथील परिस्थिती नियंत्रणात राहावी यासाठी विशेष काळजी घेण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या आहेत