अ‍ॅपशहर

दिल्ली गमावल्यानंतर काँग्रेसमध्ये अंंतर्गत कलह उघड

देशभरातील राज्यांमध्ये दीर्घकाळ सत्तेत राहिलेला काँग्रेस पक्षाला दिल्ली विधानसभा निवडणुकीत भोपळाही फोडता आला नाही. या कारणामुळे आता काँग्रेसची नेतेमंडळी पक्षाच्या रणनीतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करू लागले आहेत. तसेच हे नेते एकमेकांना दोषी ठरवून मोकळे होत आहेत.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 13 Feb 2020, 6:11 pm
नवी दिल्ली: देशभरातील राज्यांमध्ये दीर्घकाळ सत्तेत राहिलेला काँग्रेस पक्षाला दिल्ली विधानसभा निवडणुकीत भोपळाही फोडता आला नाही. या कारणामुळे आता काँग्रेसची नेतेमंडळी पक्षाच्या रणनीतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करू लागले आहेत. तसेच हे नेते एकमेकांना दोषी ठरवून मोकळे होत आहेत. या नेत्यांपैकी एक माजी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी पक्षाला आपली रणनीती बदलण्याचा सल्ला दिला आहे. तर, हरयाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्रसिंह हुड्डा यांनीही दिल्ली निवडणुकीत काँग्रेसचे प्रभारी असलेले पी. सी. चाको यांच्यावर निशाणा साधला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम काँग्रेसमध्ये कलह


दिल्लीत सलग दुसऱ्यांदा खातेही उघडू न शकलेल्या काँग्रेस पक्षातील अंतर्गत कलह नेत्यांच्या या वक्तव्यांमुळे उघड झाला आहे. काँग्रेसच्या दिल्ली प्रदेशाध्यक्षानंतर आता केंद्रीय नेतृत्वावर देखील निशाणा साधला जात आहे. काँग्रेस पक्षाला नवा विचार स्वीकारण्याची आवश्यकता असून नव्या रणनीतीवर काम करण्याची आवश्यकता असल्याचे मत ज्योतिरादित्य सिंधिया यांनी मांडले आहे. तर हरयाणाचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते भूपेंद्रसिंह हुड्डा यांनी देखील पी. सी. चाको यांना चांगलेच सुनावले आहे.

गॅस दरवाढीविरोधात राहुल गांधींचं 'स्मृती' आंदोलन

जयराम रमेश आणि वीरप्पा मोइली यांनीही मांडला बदलाचा विचार

दिल्ली व्यतिरिक्त उत्तर प्रदेश आणि बिहारमधील काँग्रेसच्या स्थितीबाबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनीही चिंता व्यक्त केली आहे. पक्षाला आता स्वत:मध्ये मोठा बदल करण्याची आवश्यकता आहे, अन्यथा पक्ष कालबाह्य ठरण्याची भीती आहे, असे जयराम रमेश म्हणाले. तर, पक्षाला जिवंत करण्यासाठी सर्जिकल अॅक्शनची आवश्यकता आहे, असे माजी केंद्रीय मंत्री वीरप्पा मोइली म्हणाले.

काश्मीर दाखवला पाकिस्तानात; राहुल गांधींच्या ट्विटवर निशाणा

पी. सी. चाको यांनी शीला दीक्षितांना धरले होते जबाबदार

काँग्रेसचा दिल्लीत पराभव झाल्यानंतर सर्वप्रथम दिल्ली काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुभाष चोपडा आणि त्यानंतर प्रभारी पी. सी. चाको यांनी राजीनामे सादर केले. काँग्रेसच्या दिल्लीतील पराभवास काँग्रेसच्या दिवंगत नेत्या शीला दीक्षित या जबाबदार असल्याचे चाको यांनी म्हटले होते. शीला दीक्षित मुख्यमंत्री असताना सन २०१३ मध्येच पक्षाची पडझड व्हायला सुरुवात झाली होती, असे ते म्हणाले.

काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपांचे सत्र

अलका लांबा आणि शर्मिष्ठा मुखर्जी यांनी उपस्थित केले प्रश्न

चांदनी चौक येथून निवडणूक लढवणाऱ्या काँग्रेसच्या उमेदवार अलका लांबा यांना एकूण ५ हजारही मते मिळू शकलेली नाहीत. आता काँग्रेस पक्षाने नवी टीम बनवून कामाला लागायला हवे, असे अलका लांबा यांचे म्हणणे आहे. दिल्ली महिला काँग्रेसच्या अध्यक्षा शर्मिष्ठा मुखर्जी यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. भारतीय जनता पक्षाला हरवण्याचे काम पक्षाने आउटसोर्स केले आहे का, अशा खोचक शब्दात त्यांनी पक्षाला टोला हाणला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज