वृत्तसंस्था, श्रीनगर
जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंट (जेकेएलएफ) या फुटीरतावादी संघटनेचा संस्थापक महंमद मकबूल भट्ट याला फाशी दिल्याच्या घटनेला मंगळवारी २६ वर्षे पूर्ण झाली. या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून काश्मीर खोऱ्यात मोबाइल इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली होती.
प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, भट्ट याच्या फाशीला २६ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त फुटीरतावादी संघटनांनी खोऱ्यात बंदचे आवाहन केले होते. त्यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, खोऱ्यात हिंसक घटना होऊ नयेत म्हणून मंगळवारी पहाटेपासून मोबाइल इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली होती. पाच ऑगस्ट २०१९ रोजी काश्मीर खोऱ्यात कलम ३७० रद्द केल्यानंतर सुमारे पाच महिने मोबाइल इंटरनेट सेवा बंद होती. त्यानंतर २५ जानेवारी रोजी काश्मीरमध्ये पुन्हा टू-जी मोबाइल इंटरनेट सेवा पुन्हा सुरू करण्यात आली होती. संसदेवर दहशतवादी हल्ला केल्याप्रकरणातील आरोपी अफजल गुरू याला फाशी दिल्याच्या घटनेला आठ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त रविवारीही मोबाइल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. अफजल गुरुला २०१३मध्ये आणि मकबूल भट्ट याला १९८४ मध्ये तिहार तुरुंगात फाशी देण्यात आली होती.
जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंट (जेकेएलएफ) या फुटीरतावादी संघटनेचा संस्थापक महंमद मकबूल भट्ट याला फाशी दिल्याच्या घटनेला मंगळवारी २६ वर्षे पूर्ण झाली. या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून काश्मीर खोऱ्यात मोबाइल इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली होती.
प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, भट्ट याच्या फाशीला २६ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त फुटीरतावादी संघटनांनी खोऱ्यात बंदचे आवाहन केले होते. त्यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, खोऱ्यात हिंसक घटना होऊ नयेत म्हणून मंगळवारी पहाटेपासून मोबाइल इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली होती. पाच ऑगस्ट २०१९ रोजी काश्मीर खोऱ्यात कलम ३७० रद्द केल्यानंतर सुमारे पाच महिने मोबाइल इंटरनेट सेवा बंद होती. त्यानंतर २५ जानेवारी रोजी काश्मीरमध्ये पुन्हा टू-जी मोबाइल इंटरनेट सेवा पुन्हा सुरू करण्यात आली होती. संसदेवर दहशतवादी हल्ला केल्याप्रकरणातील आरोपी अफजल गुरू याला फाशी दिल्याच्या घटनेला आठ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त रविवारीही मोबाइल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. अफजल गुरुला २०१३मध्ये आणि मकबूल भट्ट याला १९८४ मध्ये तिहार तुरुंगात फाशी देण्यात आली होती.