अ‍ॅपशहर

चिदंबरम यांच्या घरी सीबीआय, ईडीचे पथक

ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंगप्रकरणी सर्वोच्च न्यायालयातून दिलासा न मिळाल्याने सीबीआय आणि ईडीने आज चिदंबरम यांचे घर गाठले. मात्र चिदंबरम घरी नसल्यामुळे या दोन्ही तपास यंत्रणांना माघारी परतावं लागलं आहे. सीबीआय आणि ईडीची टीम चिदंबरम यांना अटक करण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचली होती, असं सूत्रांनी सांगितलं.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 Aug 2019, 8:45 pm
नवी दिल्ली: ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंगप्रकरणी सर्वोच्च न्यायालयातून दिलासा न मिळाल्याने सीबीआय आणि ईडीने आज चिदंबरम यांचे घर गाठले. मात्र चिदंबरम घरी नसल्यामुळे या दोन्ही तपास यंत्रणांना माघारी परतावं लागलं आहे. सीबीआय आणि ईडीची टीम चिदंबरम यांना अटक करण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचली होती, असं सूत्रांनी सांगितलं.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम chidambaram1


आज सायंकाळी उशिरा सीबीआय आणि ईडीच्या पथकानं चिदंबरम यांचं घर गाठलं. पण चिदंबरम घरी नव्हते. त्यामुळे या पथकाने चिदंबरम यांच्या घरातील नोकरांची चौकशी केली असल्याचं सूत्रांनी सांगितलं. चिदंबरम सायंकाळी ५ वाजेपर्यंत कोर्टातच होते. त्यानंतर ते कुठे गेले हे कुणालाच माहीत नाही. याप्रकरणाची अधिक माहिती घेण्यासाठी सीबीआय आणि ईडीला त्यांना अटक करायची आहे. दरम्यान, कोर्टातून बाहेर पडल्यानंतर चिदंबरम यांनी मीडियाशी बोलणे टाळले. केवळ इशाऱ्याद्वारेच त्यांनी या प्रकरणावर बोलणार नसल्याचं स्पष्ट केलं. तसेच त्यांनी त्यांच्याबरोबरच्या कनिष्ठ वकिलांनाही मीडियाशी न बोलण्याच्या सूचना दिल्या होत्या, असं सूत्रांनी सांगितलं.

दरम्यान, दिल्ली उच्च न्यायालयाने आज चिदंबरम यांची जामीन याचिका फेटाळून लावली. तसेच त्यांना तीन दिवसांची सवलत देण्याची मागणीही फेटाळून लावली आहे. उच्च न्यायालयाने झटका दिल्यानंतर चिदंबरम यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणावर आज सुनावणी करण्यास नकार दिला. मात्र त्यांची विशेष याचिका दाखल करून घेण्यात आली असून त्यावर सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी होण्याची शक्यता आहे.


आयएनएक्स मीडियाला विदेशी गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाकडून बेकायदेशीरपणे मंजुरी मिळवून देण्यासाठी ३०५ कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप चिदंबरम यांच्यावर आहे. हे प्रकरण २००७मधील असून, त्यावेळी चिदंबरम हे केंद्रीय अर्थमंत्री होते. या प्रकरणात सीबीआय आणि ईडीने यापूर्वीच चिदंबरम यांचे पुत्र कार्ती यांना अटक केली होती.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज