अ‍ॅपशहर

...म्हणून राहुल गांधी विदेशात जातात'

'राहुल गांधी हे पंतप्रधान मोदींवर नेहमीच टीका करतात. त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही. पण देशात त्यांचं कुणी ऐकत नाही, त्यामुळं त्यांना विदेशात जाऊन बोलावं लागतं,' अशा शब्दांत केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर हल्ला चढवला आहे.

Maharashtra Times 12 Sep 2017, 2:32 pm
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम irani on rahul failed dynast spoke in us about failed political path
...म्हणून राहुल गांधी विदेशात जातात'


'राहुल गांधी हे पंतप्रधान मोदींवर नेहमीच टीका करतात. त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही. पण देशात त्यांचं कुणी ऐकत नाही, त्यामुळं त्यांना विदेशात जाऊन बोलावं लागतं,' अशा शब्दांत केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर हल्ला चढवला आहे.

अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठातील विद्यार्थ्यांसमोर भाषण करताना राहुल गांधी यांनी आज मोदी राजवटीवर टीका करतानाच घराणेशाहीवरही मत मांडलं होतं. जवळपास अख्खा भारत देश घराणेशाहीवर चालतो, असं ते म्हणाले होते. राहुल यांच्या या वक्तव्यावरून भाजपनं त्यांना घेरलं आहे. 'भारतीय लोकशाही ही गुणवत्तेवर चालते. घराणेशाहीवर चालत नाही. देशाचे सध्याचे पंतप्रधान, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू हा त्याचा पुरावा आहे. हे तिघेही कुठलीही विशिष्ट पार्श्वभूमी नसलेल्या घरातून आले आहेत. त्यांनी संघर्षानं आपलं स्थान मिळवलं आहे. राहुल गांधी हे स्वत: एक नापास वारसदार आहेत. संपूर्ण देशावर घराणेशाहीचा आरोप करून त्यांनी देशातील जनतेचा अपमान केला आहे,' असं इराणी म्हणाल्या. '

'राहुल गांधी यांची रणनीती पुन्हा एकदा फसली आहे. दुसऱ्या देशात जाऊन आपल्या देशाबद्दल काय आणि कसं बोलावं याची समज त्यांना नाही. भारतात कुणी ऐकत नाही म्हणून आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर जाऊन त्यांनी स्वत:च्या राजकीय अपयशाचा पाढा वाचला आहे. त्यांनी आपल्या यशापयशाचा हिशेब अमेठीत येऊन द्यायला हवा. स्वत:च्या मतदारसंघात त्यांनी काय केलंय हे सांगितलं तरी सगळं चित्र स्पष्ट होईल,' असं इराणी म्हणाल्या.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज