अ‍ॅपशहर

लोकशाहीचे हे 'मोदी मॉडेल' आहे का?

दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग आणि मुखमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यात पुन्हा जुंपली असून राज्यपालांनी तडकाफडकी केलेल्या बदल्यांवरून केजरीवाल यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. मला वा अन्य कोणत्याही मंत्र्याला कल्पना न देता परस्पर अधिकाऱ्यांची बदली होते, हे लोकशाहीचे 'मोदी मॉडेल' आहे का?, असा खरमरीत सवालच केजरीवाल यांनी ट्विटरच्या माध्यमातून विचारला आहे.

Maharashtra Times 30 Aug 2016, 2:34 pm
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम is this modi model of democracy arvind kejriwal
लोकशाहीचे हे 'मोदी मॉडेल' आहे का?


दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग आणि मुखमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यात पुन्हा जुंपली असून राज्यपालांनी तडकाफडकी केलेल्या बदल्यांवरून केजरीवाल यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. मला वा अन्य कोणत्याही मंत्र्याला कल्पना न देता परस्पर अधिकाऱ्यांची बदली होते, हे लोकशाहीचे 'मोदी मॉडेल' आहे का?, असा खरमरीत सवालच केजरीवाल यांनी ट्विटरच्या माध्यमातून विचारला आहे. मोदी जंग यांना हाताशी धरून दिल्लीला उद्ध्वस्त करू पाहत आहेत, असा हल्लाही केजरीवाल यांनी चढवला.

नायब राज्यपाल नजीब जंग आणि मुख्यमंत्री केजरीवाल यांच्यात अनेक मुद्द्यांवरून वारंवार खटके उडत आहेत. आज अचानक झालेल्या बदल्यांनी ही 'जंग' नव्या वळणावर पोहोचली आहे. मोहल्ला क्लिनिक आणि शाळांची उभारणी करत असलेल्या सचिवांची ३१ मार्चपर्यंत बदली करू नये, अशी विनंती केली असतानाही जंग यांनी या बदल्या परस्पर केल्याचा आरोप लावत केजरीवाल यांनी संताप व्यक्त केला.

उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी नायब राज्यपालांचे पाय धरून विनंती केली असतानाही अधिकाऱ्यांना हटवण्यात आले. त्यांच्या बदलीच्या फाइल्स ना मला दाखवल्या, ना कुणा मंत्र्याला दाखवण्यात आल्या. सगळं काही परस्पर करण्यात आलं. हेच का लोकशाहीचं 'मोदी मॉडेल'?, असा सवाल केजरीवाल यांनी आपल्या ट्विटमधून विचारला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज