अ‍ॅपशहर

आसाममधून बेपत्ता झालेल्या विमानाचा उपग्रहाद्वारे शोध घेणार

आसाममधून बेपत्ता झालेल्या हवाई दलाच्या लढाऊ विमानाचा अद्यापही शोध लागलेला नाही. त्यामुळे आता हे विमान उपग्रहाद्वारे शोधण्यात येणार आहे. तसेच या विमानाचा शोध घेण्यासाठी तामिळनाडूतूनही दीर्घ पल्ल्याचं रेकी विमान रवाना झालं आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 4 Jun 2019, 8:19 pm
नवी दिल्ली: आसाममधून बेपत्ता झालेल्या हवाई दलाच्या लढाऊ विमानाचा अद्यापही शोध लागलेला नाही. त्यामुळे आता हे विमान उपग्रहाद्वारे शोधण्यात येणार आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम plane


सोमवारी दुपारी हवाई दलाचं एएन-३२ हे विमान बेपत्ता झालं होतं. आसाममधील जोरहत येथून विमानानं उड्डाण केलं होतं. त्यानंतर ते बेपत्ता झाले होते. यावेळी विमानात १३ जण होते. अरुणाचल प्रदेशातील चीन सीमेजवळील मेचुका व्हॅली येथील अॅडव्हान्स्ड लॅंडिग ग्राऊंड येथे पोहोचणे अपेक्षित होते, मात्र तत्पूर्वीच या विमानाचा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला. त्यानंतर हवाई दलाने आपली सुखोई एसयू-३० लढाऊ विमान, सी-१३० हरक्युलस ही विमाने शोधकार्यासाठी पाठवली. मात्र, अद्यापही बेपत्ता विमानाचा शोध लागू शकला नाही. त्यामुळे या विमानाचा शोध घेण्यासाठी नौदलाचे 'पी ८ आय' हे दीर्घ पल्ल्याचे रेकी विमान तामिळनाडूहून रवाना झाले आहे. त्याचबरोबर उपग्रहाच्या माध्यमातूनही विमानाचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज