हैदराबाद:
शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरी आणि रोजगाराच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. २०१९मध्ये आयटी आणि स्टार्टअप कंपन्या एकूण पाच लाख तरुणांना नोकऱ्या आणि रोजगार देऊ शकतात, असा अंदाज आयटी क्षेत्रातील तज्ज्ञ आणि इन्फोसिसचे माजी मुख्य वित्तीय अधिकारी मोहनदास पै यांनी व्यक्त केला आहे.
आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या (एन्ट्री लेव्हल) वेतनात २०१८मध्ये २० टक्क्यांची वाढ झाली आहे. गेली सात वर्षे वेतनात कोणतीही वाढ झाली नव्हती. मात्र, आता आयटी उद्योग पुन्हा भरभराटीच्या मार्गावर आहे. एच-वन बी व्हिसा प्रक्रिया अधिक कठिण झाल्यानं भारतीय कंपन्या जपान आणि आग्नेय आशियावर अधिक लक्ष केंद्रीत करत आहेत, असं पै यांनी सांगितलं. काही कंपन्या आता उच्च गुणवत्ता असलेल्या कर्मचाऱ्यांचे (एन्ट्री लेव्हल) वार्षिक वेतन ४.५ लाखांवरून ५ लाख रुपये करत आहेत, असंही त्यांनी सांगितलं.
स्टार्टअप कंपन्या देणार २ लाख नोकऱ्या
नुकतेच शिक्षण पूर्ण करून नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी २०१९ हे वर्ष चांगलं असणार आहे. पुढील वर्षी स्टार्टअप कंपन्या २ लाख नोकऱ्या देणार आहेत. आयटी आणि स्टार्टअप कंपन्या एकूण साडेचार ते पाच लाख कर्मचाऱ्यांची भरती करणार आहेत, असा अंदाज पै यांनी व्यक्त केला.
शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरी आणि रोजगाराच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. २०१९मध्ये आयटी आणि स्टार्टअप कंपन्या एकूण पाच लाख तरुणांना नोकऱ्या आणि रोजगार देऊ शकतात, असा अंदाज आयटी क्षेत्रातील तज्ज्ञ आणि इन्फोसिसचे माजी मुख्य वित्तीय अधिकारी मोहनदास पै यांनी व्यक्त केला आहे.
आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या (एन्ट्री लेव्हल) वेतनात २०१८मध्ये २० टक्क्यांची वाढ झाली आहे. गेली सात वर्षे वेतनात कोणतीही वाढ झाली नव्हती. मात्र, आता आयटी उद्योग पुन्हा भरभराटीच्या मार्गावर आहे. एच-वन बी व्हिसा प्रक्रिया अधिक कठिण झाल्यानं भारतीय कंपन्या जपान आणि आग्नेय आशियावर अधिक लक्ष केंद्रीत करत आहेत, असं पै यांनी सांगितलं. काही कंपन्या आता उच्च गुणवत्ता असलेल्या कर्मचाऱ्यांचे (एन्ट्री लेव्हल) वार्षिक वेतन ४.५ लाखांवरून ५ लाख रुपये करत आहेत, असंही त्यांनी सांगितलं.
स्टार्टअप कंपन्या देणार २ लाख नोकऱ्या
नुकतेच शिक्षण पूर्ण करून नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी २०१९ हे वर्ष चांगलं असणार आहे. पुढील वर्षी स्टार्टअप कंपन्या २ लाख नोकऱ्या देणार आहेत. आयटी आणि स्टार्टअप कंपन्या एकूण साडेचार ते पाच लाख कर्मचाऱ्यांची भरती करणार आहेत, असा अंदाज पै यांनी व्यक्त केला.