नवी दिल्ली : लडाखच्या गलवान खोऱ्यात चीनी सैनिकांसोबत झालेल्या हाणामारीत सहभागी झालेला भारतीय सेनेचा कोणताही जवान बेपत्ता नाही, असं लष्कराकडून स्पष्ट करण्यात आलंय. सोमवारी मध्यरात्री भारत आणि चीनी सैनिकांदरम्यान झालेल्या हिंसक झडपेत भारताचे २० जवान शहीद झाले तर चार जवान गंभीररित्या जखमी झाले आहेत. यामध्ये एका कर्नल हुद्यावरील लष्करी अधिकाऱ्याचाही समावेश आहे. उल्लेखनीय म्हणजे, दोन्ही देशांदरम्यान तब्बल पाच दशकानंतर सैनिकी हाणामारीत रक्तपात झाल्याची घटना घडलीय.
गलवानच्या या हाणामारीत चीनी सैन्याच्या ४३ जण गंभीर झाल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. यातील काहींचा मृत्यू झाल्याची शक्यताही वृत्तसंस्था 'एएनआय'नं वर्तवली आहे. पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यामध्ये भारतीय लष्कर आणि चीनच्या सैनिकांमध्ये सोमवारी रात्री ही झटापट घडून आली. चीनने भारताने सीमा ओलांडल्याचा दावा केला आहे. प्रत्यक्ष सीमारेषेवर दोन महिन्यांपासून असणारा तणाव कमी करण्यासाठी दोन्ही बाजूंकडून माघार घेतली जात असताना ही घटना घडली. भारत आणि चीन यांच्यामध्ये ४८८ किलोमीटर लांबीची सीमा रेषा आहे. यातील बहुतांश सीमा विवादित असून, त्यावर चर्चा सुरू आहे. दोन्ही सैन्यामध्ये १९७५ मध्ये अरुणाचल प्रदेशातील तुलुंग ला येथे चकमक झाली होती, त्यात भारताचे चार सैनिक हुतात्मा झाले होते. त्यानंतर प्रथमच दोन्ही देशांच्या सैन्यात चकमक होऊन त्यात जीवितहानी झाली.
वाचा : अद्यापही सैनिक बेपत्ता? सोनिया गांधींचा पंतप्रधानांना सवाल
वाचा : 'मेरा सुनील अमर रहे', हुतात्म्याला पत्नी-मुलानं दिला अंतिम निरोप
वाचा : लडाख ते अरुणाचल; आर्मीकडून धडकी भरायला लावणारं सैन्य सीमेवर तैनात
काँग्रेसनं विचारला होता प्रश्न?
बुधवारी काँग्रेसनं जाहीर केलेल्या एका व्हिडिओत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी '२० सैनिकांना हौतात्म्य पत्करण्याची वेळ का आली? आपले सैन्य अधिकारी किंवा सैनिक अद्यापही बेपत्ता आहेत का? आपले आणखी किती अधिकारी आणि सैनिक गंभीररित्या जखमी आहेत? चीननं भारताच्या किती आणि कोणत्या भागावर ताबा मिळवलाय? या परिस्थितीला रोखण्यासाठी सरकारची रणनीती काय आहे?' असे काही प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर, भारतीय लष्कराचे आणखीही काही सैनिक बेपत्ता असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या.
वाचा : #BoycottChineseProducts : केंद्राकडून टेलिकॉम कंपन्यांना सूचना
वाचा : भारत-चीनमधील मेजर जनरल स्तरावरील चर्चा निष्फळः सूत्र
वाचा : भारत-चीन तणाव; लष्कर, हवाई दल आणि नौदलाला अॅलर्ट
गलवानच्या या हाणामारीत चीनी सैन्याच्या ४३ जण गंभीर झाल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. यातील काहींचा मृत्यू झाल्याची शक्यताही वृत्तसंस्था 'एएनआय'नं वर्तवली आहे. पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यामध्ये भारतीय लष्कर आणि चीनच्या सैनिकांमध्ये सोमवारी रात्री ही झटापट घडून आली. चीनने भारताने सीमा ओलांडल्याचा दावा केला आहे. प्रत्यक्ष सीमारेषेवर दोन महिन्यांपासून असणारा तणाव कमी करण्यासाठी दोन्ही बाजूंकडून माघार घेतली जात असताना ही घटना घडली. भारत आणि चीन यांच्यामध्ये ४८८ किलोमीटर लांबीची सीमा रेषा आहे. यातील बहुतांश सीमा विवादित असून, त्यावर चर्चा सुरू आहे. दोन्ही सैन्यामध्ये १९७५ मध्ये अरुणाचल प्रदेशातील तुलुंग ला येथे चकमक झाली होती, त्यात भारताचे चार सैनिक हुतात्मा झाले होते. त्यानंतर प्रथमच दोन्ही देशांच्या सैन्यात चकमक होऊन त्यात जीवितहानी झाली.
वाचा : अद्यापही सैनिक बेपत्ता? सोनिया गांधींचा पंतप्रधानांना सवाल
वाचा : 'मेरा सुनील अमर रहे', हुतात्म्याला पत्नी-मुलानं दिला अंतिम निरोप
वाचा : लडाख ते अरुणाचल; आर्मीकडून धडकी भरायला लावणारं सैन्य सीमेवर तैनात
काँग्रेसनं विचारला होता प्रश्न?
बुधवारी काँग्रेसनं जाहीर केलेल्या एका व्हिडिओत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी '२० सैनिकांना हौतात्म्य पत्करण्याची वेळ का आली? आपले सैन्य अधिकारी किंवा सैनिक अद्यापही बेपत्ता आहेत का? आपले आणखी किती अधिकारी आणि सैनिक गंभीररित्या जखमी आहेत? चीननं भारताच्या किती आणि कोणत्या भागावर ताबा मिळवलाय? या परिस्थितीला रोखण्यासाठी सरकारची रणनीती काय आहे?' असे काही प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर, भारतीय लष्कराचे आणखीही काही सैनिक बेपत्ता असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या.
वाचा : #BoycottChineseProducts : केंद्राकडून टेलिकॉम कंपन्यांना सूचना
वाचा : भारत-चीनमधील मेजर जनरल स्तरावरील चर्चा निष्फळः सूत्र
वाचा : भारत-चीन तणाव; लष्कर, हवाई दल आणि नौदलाला अॅलर्ट