मटा ऑनलाइन वृत्त | बारामुल्ला
जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत जैश-ए-मोहम्मदचा कमांडर अबु खालिदला कंठस्नान घालण्यात आलं. बीएसएफ कॅम्पवरील दहशतवादी हल्ल्याचा तो सूत्रधार होता. तेव्हापासून पोलीस त्याच्या मागावर होते.
जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक एस. पी. वैद्य यांनी 'टाइम्स नाऊ'शी बोलताना या वृत्ताला दुजोरा दिला. दहशतवाद्यांनी ३ ऑक्टोबर रोजी श्रीनगर विमानतळाजवळील बीएसएफच्या कॅम्पवर हल्ला केला होता. सुरक्षादलांनी दहशतवाद्यांना सडेतोड उत्तर दिलं. या कारवाईत तीन दहशतवाद्यांना ठार केलं होतं. या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार खालिदचा शोध सुरू होता, असं वैद्य यांनी सांगितलं.
दरम्यान, सीमेपलिकडून होणाऱ्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देण्यास सांगितले आहे. प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत भारतीय जवान दररोज पाच ते सहा दहशतवाद्यांचा खात्मा करतात. पाकिस्तानकडून गोळीबार झाल्यास तात्काळ प्रत्युत्तर द्या, अशा सूचना जवानांना दिल्या आहेत, असं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितलं.
जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत जैश-ए-मोहम्मदचा कमांडर अबु खालिदला कंठस्नान घालण्यात आलं. बीएसएफ कॅम्पवरील दहशतवादी हल्ल्याचा तो सूत्रधार होता. तेव्हापासून पोलीस त्याच्या मागावर होते.
जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक एस. पी. वैद्य यांनी 'टाइम्स नाऊ'शी बोलताना या वृत्ताला दुजोरा दिला. दहशतवाद्यांनी ३ ऑक्टोबर रोजी श्रीनगर विमानतळाजवळील बीएसएफच्या कॅम्पवर हल्ला केला होता. सुरक्षादलांनी दहशतवाद्यांना सडेतोड उत्तर दिलं. या कारवाईत तीन दहशतवाद्यांना ठार केलं होतं. या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार खालिदचा शोध सुरू होता, असं वैद्य यांनी सांगितलं.
दरम्यान, सीमेपलिकडून होणाऱ्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देण्यास सांगितले आहे. प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत भारतीय जवान दररोज पाच ते सहा दहशतवाद्यांचा खात्मा करतात. पाकिस्तानकडून गोळीबार झाल्यास तात्काळ प्रत्युत्तर द्या, अशा सूचना जवानांना दिल्या आहेत, असं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितलं.