अ‍ॅपशहर

जल्लिकट्टू: बैलाच्या हल्ल्यात पोलिसाचा मृत्यू

तामिळनाडूतील कंसपुरम गावात सुरू असलेल्या जल्लिकट्टू कार्यक्रमात बेभान झालेल्या बैलाने शिंगाने भोसकल्याने एका पोलिसाचा मृत्यू झाला आहे. याबरोबर पुदुक्कोटई जिल्ह्यातील रपुसल गावातील जल्लिकट्टूमध्ये बैलाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या एका दर्शकाचाही काल (सोमवारी) मृत्यू झाला आहे.

Maharashtra Times 24 Jan 2017, 10:44 am
मटा ऑनलाइन वृत्त। विरुधुनगर (तामिळनाडू)
महाराष्ट्र टाइम्स.कॉम jallikattu bull gores tamil nadu cop to death in virudhunagar
जल्लिकट्टू: बैलाच्या हल्ल्यात पोलिसाचा मृत्यू


तामिळनाडूतील कंसपुरम गावात सुरू असलेल्या जल्लिकट्टू कार्यक्रमात बेभान झालेल्या बैलाने शिंगाने भोसकल्याने एका पोलिसाचा मृत्यू झाला आहे. याबरोबर पुदुक्कोटई जिल्ह्यातील रपुसल गावातील जल्लिकट्टूमध्ये बैलाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या एका दर्शकाचाही काल (सोमवारी) मृत्यू झाला आहे.

मृत्यू पावलेल्या पोलीस शिपायाचे नाव एम. शंकर असे आहे. तो शिवगंगा सशस्त्र राखीव पोलीस दलाचा शिपाई आहे. एम. शंकर ड्यूटीवर असताना ही दुर्घटना घडली. रिंगणात धावत असलेला बैल अचानक मागे वळला आणि मागे ड्यूटी करत असलेल्या पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला केला. उधळलेला बैल आपल्या दिशेने येत असल्याचे पाहून सर्व पोलीस जीव मुठीत घेऊन पळाले. मात्र एम. शंकर या बैलाच्या हल्ल्यात जखमी झाले. हल्ल्यानंतर एम. शंकर यांना तातडीने जवळच्या एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपाचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

एम. शंकर यांच्या मागे त्यांची पत्नी मुथुलसदाची, तर गुरूपंडी (५) आणि गुरूसाधना (३) अशी दोन मुले आहेत

रपुसल गावातील जल्लिकट्टूतील हल्ल्यात मृत्यू पावलेल्या करुपैय्या या व्यक्तीचा ट्रीची शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. ट्रीचीत दाखल करण्यापूर्वी करुपैय्या यांना पदुक्कोट्टई शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

कंसपुरम गावातील जल्लिकट्टू कार्यक्रमाचे उद्घाटन तामिळनाडूचे आरोग्य मंत्री सी. विजयभास्कर यांच्या हस्ते झाले होते. या कार्यक्रमात एकूण १९४ बैलांचा सहभाग होता. येथील कार्यक्रमात बैलांच्या हल्ल्यात एकूण १२९ व्यक्ती जखमी झाल्याचे वृत्त आहे.

दरम्यान, आपल्या कार्यक्रमाच्या आयोजनात कोणत्याही प्रकारच्या त्रुटी असल्याचा जल्लिकट्टू आयोजन समितीचे सदस्य एम. सेंथील कुमार यांनी इन्कार केला आहे. कार्यक्रमात घडलेल्या घटना दुर्देवी आहेत, असे अपघात टाळता येऊ शकतात, मात्र ते पूर्णपणे थांबवता येणार नाहीत असेही त्यांचे म्हणणे आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज