श्रीनगर: जम्मू-काश्मीरमधील नौशेरा सेक्टरमध्ये मंगळवारी सकाळी नियंत्रण रेषेपासून ५०० मीटर अंतरावर असलेल्या भारतीय सुरक्षा चौकीवर दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात एक ज्युनियर कमिशन्ड ऑफिसर शहीद झाला आहे. या घटनेनंतर भारतीय जवानांनी प्रत्युत्तरादाखल जोरदार गोळीबार सुरू केला असून परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
एकीकडे दहशतवाद्यांनी भारतीय सुरक्षा चौकीला लक्ष्य केले असताना एलओसीवर पाकिस्तानच्या कुरापती वाढल्या आहेत. आज पाकने पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन करत गोळीबार केला. एलओसीवर शांतता राखण्याचं आवाहन सोमवारीच करणाऱ्या पाकने शब्द न पाळता आज पुन्हा एकदा आपले रंग दाखवले आहेत. याआधी रविवारी पाककडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं होतं. त्यात दोन जवान शहीद झाले होते तर एका नागरिकाचा मृत्यू झाला होता. त्याला चोख प्रत्युत्तर देत भारताने पाकव्याप्त काश्मीरमधील तीन दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते. भारताच्या कारवाईत २२ दहशतवादी व पाकचे १० सैनिक ठार झाले होते.
...म्हणून पीओकेमध्ये कारवाई: लष्करप्रमुख
भारताच्या कारवाईनंतर पाककडून सोमवारी नरमाईची भाषा करण्यात आली होती. सीमेवर शांतता प्रस्थापित करण्याची गरज आहे. त्यासाठी दोन्ही बाजूने प्रयत्न व्हायला हवेत, असे पाकचे म्हणणे होते. काही राजकीय पुढारी व पत्रकारांना एलओसी परिसराचा दौरा करायचा आहे, असेही सांगण्यात आले होते. भारताने पाकच्या या भूमिकेवर सकारात्मक प्रतिसादही दिला होता. मात्र, सोमवारची रात्र उलटताच पाकिस्तानने पुन्हा आज सीमेवर कुरापती काढल्या. पाककडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं. शाळा असलेल्या परिसरात गोळीबार करण्यात आला. या स्थितीत पाकवर विश्वास कसा ठेवायचा, असा सवाल भारतीय लष्कराशी संबंधित सूत्रांनी उपस्थित केला आहे.
पाक विमानांच्या घिरट्या
भारताने पाकव्याप्त काश्मिरात केलेल्या कारवाईनंतर दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू आहेत. पाकव्याप्त काश्मिरात पाक हवाईदलाची विमाने घिरट्या घालताना दिसली आहेत. त्यामुळे उत्तरेकडील सीमाभागांत भारतीय लष्कर सतर्क झालं आहे. पंजाबमध्ये होशियारपूर परिसरात भारतीय हवाईदलाची विमानं सज्ज ठेवण्यात आली आहेत. अतिमहत्त्वाच्या ठिकाणांवरही सतर्कता बाळगण्यात येत आहे, अशी माहिती लष्करातील सूत्रांनी दिली.
लष्कराची PoKमध्ये कारवाई; २२ अतिरेकी ठार
एकीकडे दहशतवाद्यांनी भारतीय सुरक्षा चौकीला लक्ष्य केले असताना एलओसीवर पाकिस्तानच्या कुरापती वाढल्या आहेत. आज पाकने पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन करत गोळीबार केला. एलओसीवर शांतता राखण्याचं आवाहन सोमवारीच करणाऱ्या पाकने शब्द न पाळता आज पुन्हा एकदा आपले रंग दाखवले आहेत. याआधी रविवारी पाककडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं होतं. त्यात दोन जवान शहीद झाले होते तर एका नागरिकाचा मृत्यू झाला होता. त्याला चोख प्रत्युत्तर देत भारताने पाकव्याप्त काश्मीरमधील तीन दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते. भारताच्या कारवाईत २२ दहशतवादी व पाकचे १० सैनिक ठार झाले होते.
...म्हणून पीओकेमध्ये कारवाई: लष्करप्रमुख
भारताच्या कारवाईनंतर पाककडून सोमवारी नरमाईची भाषा करण्यात आली होती. सीमेवर शांतता प्रस्थापित करण्याची गरज आहे. त्यासाठी दोन्ही बाजूने प्रयत्न व्हायला हवेत, असे पाकचे म्हणणे होते. काही राजकीय पुढारी व पत्रकारांना एलओसी परिसराचा दौरा करायचा आहे, असेही सांगण्यात आले होते. भारताने पाकच्या या भूमिकेवर सकारात्मक प्रतिसादही दिला होता. मात्र, सोमवारची रात्र उलटताच पाकिस्तानने पुन्हा आज सीमेवर कुरापती काढल्या. पाककडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं. शाळा असलेल्या परिसरात गोळीबार करण्यात आला. या स्थितीत पाकवर विश्वास कसा ठेवायचा, असा सवाल भारतीय लष्कराशी संबंधित सूत्रांनी उपस्थित केला आहे.
पाक विमानांच्या घिरट्या
भारताने पाकव्याप्त काश्मिरात केलेल्या कारवाईनंतर दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू आहेत. पाकव्याप्त काश्मिरात पाक हवाईदलाची विमाने घिरट्या घालताना दिसली आहेत. त्यामुळे उत्तरेकडील सीमाभागांत भारतीय लष्कर सतर्क झालं आहे. पंजाबमध्ये होशियारपूर परिसरात भारतीय हवाईदलाची विमानं सज्ज ठेवण्यात आली आहेत. अतिमहत्त्वाच्या ठिकाणांवरही सतर्कता बाळगण्यात येत आहे, अशी माहिती लष्करातील सूत्रांनी दिली.
लष्कराची PoKमध्ये कारवाई; २२ अतिरेकी ठार