अ‍ॅपशहर

काश्मीर २ महिन्यांनंतर पर्यटकांसाठी पुन्हा खुले

भारताचे नंदनवन अशी ओळख असलेल्या जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून असलेली पर्यटकबंदी अखेर उठवण्यात आली आहे. गृह विभागाने २ ऑगस्ट २०१९ रोजी पर्यटकांसाठी काढलेला मनाई आदेश मागे घेण्यात आला असून पर्यटक आता जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटनासाठी येऊ शकतात. त्यांना आवश्यकते सर्व सहकार्य व मदत राज्य सरकारकडून मिळेल, असे ताज्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 10 Oct 2019, 5:38 pm
नवी दिल्ली : भारताचे नंदनवन अशी ओळख असलेल्या जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून असलेली पर्यटकबंदी अखेर उठवण्यात आली आहे. गृह विभागाने २ ऑगस्ट २०१९ रोजी पर्यटकांसाठी काढलेला मनाई आदेश मागे घेण्यात आला असून पर्यटक आता जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटनासाठी येऊ शकतात. त्यांना आवश्यकते सर्व सहकार्य व मदत राज्य सरकारकडून मिळेल, असे ताज्या आदेशात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी ८ ऑगस्ट रोजी काश्मीरमधील सुरक्षेचा आढावा घेतला होता. याच बैठकीत पर्यटकांसाठीचा प्रतिबंधात्मक आदेश मागे घेण्यात यावा, अशी सूचना राज्यपालांनी गृह विभागाला केली होती. त्यानुसारच हा आदेश काढण्यात आला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम kashmir


जम्मू-काश्मीरच्या गृह विभागाने बुधवारी एक आदेश काढून काश्मीर खोऱ्यात पर्यटकांसाठी घातलेले निर्बंध मागे घेतले आहेत. या आदेशाची प्रत राज्यपालांसह पुढील कार्यवाहीसाठी सर्व संबंधित विभागांना पाठवण्यात आली आहे.

जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारं कलम ३७० हटवण्याचा ऐतिहासिक निर्णय केंद्र सरकारने ५ ऑगस्ट रोजी घेतला. त्याआधी सुरक्षेच्या कारणास्तव २ ऑगस्ट रोजी एक आदेश काढून पर्यटकांना तत्काळ काश्मीर सोडण्याची सूचना देण्यात आली होती. तेव्हापासून काश्मीरमधील पर्यटन व्यवसाय जवळपास ठप्प पडलेला असून आता पर्यटकबंदी उठवण्यात आल्याने काश्मीरमध्ये पर्यटकांची वर्दळ वाढून पर्यटन व्यवसाय पुन्हा रूळावर येईल, अशी आशा निर्माण झाली आहे.

काश्मीर हळूहळू पूर्वपदावर

काश्मीरमधील बहुतांश पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील प्रतिबंधात्मक आदेश मागे घेण्यात आला आहे. हळूहळू सर्व स्थिती सामान्य होत आहे. काही भागांत अजूनही इंटरनेट सेवा बहाल करण्यात आलेली नाही. ती समस्याही काही दिवसांत दूर होईल, असे सांगितले जात आहे. पर्यटकांची गैरसोय होऊ नये, यादृष्टीने पावले उचलली जात आहेत, असे प्रशासनातील सूत्रांनी सांगितले.

काश्मिरात ९ लाख जवान कशासाठी?: मुफ्ती

तीन नेत्यांची सुटका

काश्मीरला असलेला विशेष राज्याचा दर्जा काढून घेण्यात आल्यानंतर अनेक नेत्यांची धरपकड करण्यात आली होती. त्यांना ताब्यात घेण्यात आलं होतं. यापैकी यावर मीर, नूर मोहम्मद आणि शोएब लोन या तीन नेत्यांची आज सुटका करण्यात आली. मीर हे राफियाबादचे माजी आमदार आहेत. लोन उत्तर काश्मीर मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढले होते. त्यात पराभव झाल्याने नंतर त्यांनी काँग्रेस पक्ष सोडला होता. पीपल्स कॉन्फरन्सचे प्रमुख सज्जाद लोन यांचे ते निकटवर्तीय आहेत तर नूर मोहम्मद हे नॅशनल कॉन्फरन्सचे पदाधिकारी आहेत.

उघडले स्वर्गाचे दार; काश्मीर पर्यटकांसाठी होणार खुले

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज