वृत्तसंस्था, बेंगळुरू
'आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात काँग्रेसमधील नाराज आमदार अधिवेशनापासून दूर राहतील आणि सरकारच्या अडचणी वाढतील, अशी चर्चा सुरू आहे. मात्र, ही चर्चा निराधार आहे. मी काँग्रेस आमदारांच्या नियमित संपर्कात असून, राज्यातील धर्मनिरपेक्ष जनता दल (जेडीएस) - काँग्रेस आघाडी सरकारला कोणताही धोका नाही,'असा दावा कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी रविवारी केला आहे.
'केवळ लोकसभा निवडणुकीपर्यंतच नव्हे, तर त्यापुढेही आमची आघाडी कायम राहील. आमचे सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ निश्चितपणे पूर्ण करेल,'असेही ते म्हणाले. कर्नाटक विधानसभेचे अधिवेशन सहा फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. काँग्रेसचे नाराज आमदार या अधिवेशनापासून दूर राहतील, अशी चर्चा राज्यात सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर कुमारस्वामी यांनी हा दावा केला आहे.
'प्रसारमाध्यमातील काही जणांकडून काँग्रेसचे नाराज आमदार अधिवेशनापासून दूर राहतील आणि सरकार अस्थिर होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. परंतु, तसे काहीही होणार नाही. हे नाराज आमदार काँग्रेसच्या संपर्कात आहेत की नाहीत माहीत नाही; परंतु माझ्या नियमित संपर्कात आहेत. आजही माझी त्यांच्याशी चर्चा झाली आहे. ते अधिवेशनास उपस्थित राहतील,'असा विश्वासही कुमारस्वामी यांनी व्यक्त केला. तसेच, भाजपमध्येही काही असे नेते आहेत जे आमच्या सरकारला धोका निर्माण झाला, तर नक्कीच मदत करतील, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला.
दरम्यान, 'राज्यात भाजप सत्ता स्थापण्याच्या भ्रमात असून, भाजपकडून काँग्रेसच्या आमदारांना ५० कोटींची ऑफर देण्यात येत आहे,'असा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या यांनी केला आहे. तसेच, 'भाजपकडून काँग्रेस आमदारांना १०० कोटींची ऑफर देण्यात आली, तरी काँग्रेसचा कोणीही आमदार फुटणार नाही,'असे ते म्हणाले.
'भावना माझ्या रोमारोमात'
'माझ्या रोमारोमात भावना आहे. त्यावर नियंत्रण मिळवणे मला शक्य नाही. मला राज्यातील जनतेची सहानुभूती आहे,'अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी सोमवारी दिली.
गेल्या आठवड्यात काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे काही समर्थक आमदार 'आम्ही सिद्धरामय्या यांनाच मुख्यमंत्री मानतो,'असे म्हटले होते. त्यावरून, भावनिक होत कुमारस्वामी यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची भावना बोलून दाखवली होती.
पंतप्रधानांचे प्रयत्न नाहीत
दरम्यान, कुमारस्वामी यांचे सरकार अस्थिर करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्नशील असतील असे वाटत नाही, मात्र पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी राज्यातील नेतृत्वाला तशा सूचना दिल्या आहेत का, असा सवाल माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांनी केला आहे.
\R
'आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात काँग्रेसमधील नाराज आमदार अधिवेशनापासून दूर राहतील आणि सरकारच्या अडचणी वाढतील, अशी चर्चा सुरू आहे. मात्र, ही चर्चा निराधार आहे. मी काँग्रेस आमदारांच्या नियमित संपर्कात असून, राज्यातील धर्मनिरपेक्ष जनता दल (जेडीएस) - काँग्रेस आघाडी सरकारला कोणताही धोका नाही,'असा दावा कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी रविवारी केला आहे.
'केवळ लोकसभा निवडणुकीपर्यंतच नव्हे, तर त्यापुढेही आमची आघाडी कायम राहील. आमचे सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ निश्चितपणे पूर्ण करेल,'असेही ते म्हणाले. कर्नाटक विधानसभेचे अधिवेशन सहा फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. काँग्रेसचे नाराज आमदार या अधिवेशनापासून दूर राहतील, अशी चर्चा राज्यात सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर कुमारस्वामी यांनी हा दावा केला आहे.
'प्रसारमाध्यमातील काही जणांकडून काँग्रेसचे नाराज आमदार अधिवेशनापासून दूर राहतील आणि सरकार अस्थिर होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. परंतु, तसे काहीही होणार नाही. हे नाराज आमदार काँग्रेसच्या संपर्कात आहेत की नाहीत माहीत नाही; परंतु माझ्या नियमित संपर्कात आहेत. आजही माझी त्यांच्याशी चर्चा झाली आहे. ते अधिवेशनास उपस्थित राहतील,'असा विश्वासही कुमारस्वामी यांनी व्यक्त केला. तसेच, भाजपमध्येही काही असे नेते आहेत जे आमच्या सरकारला धोका निर्माण झाला, तर नक्कीच मदत करतील, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला.
दरम्यान, 'राज्यात भाजप सत्ता स्थापण्याच्या भ्रमात असून, भाजपकडून काँग्रेसच्या आमदारांना ५० कोटींची ऑफर देण्यात येत आहे,'असा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या यांनी केला आहे. तसेच, 'भाजपकडून काँग्रेस आमदारांना १०० कोटींची ऑफर देण्यात आली, तरी काँग्रेसचा कोणीही आमदार फुटणार नाही,'असे ते म्हणाले.
'भावना माझ्या रोमारोमात'
'माझ्या रोमारोमात भावना आहे. त्यावर नियंत्रण मिळवणे मला शक्य नाही. मला राज्यातील जनतेची सहानुभूती आहे,'अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी सोमवारी दिली.
गेल्या आठवड्यात काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे काही समर्थक आमदार 'आम्ही सिद्धरामय्या यांनाच मुख्यमंत्री मानतो,'असे म्हटले होते. त्यावरून, भावनिक होत कुमारस्वामी यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची भावना बोलून दाखवली होती.
पंतप्रधानांचे प्रयत्न नाहीत
दरम्यान, कुमारस्वामी यांचे सरकार अस्थिर करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्नशील असतील असे वाटत नाही, मात्र पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी राज्यातील नेतृत्वाला तशा सूचना दिल्या आहेत का, असा सवाल माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांनी केला आहे.
\R