रांची (झारखंड): महाराष्ट्रात विरोधी विचारांच्या शिवसेनेबरोबर महाआघाडी करत सत्तेत आलेल्या काँग्रेस पक्षासाठी झारखंडमधून गोड बातमी मिळते आहे. झारखंडमधील महाआघाडीला निकालांमध्ये बहुमत मिळत असल्याचे स्पष्ट होत आहे. झारखंड राज्यातील जनतेने भारतीय जनता पक्षाच्या फूट पाडणाऱ्या धोरणांविरोधात मतदान करून तोडीसतोड उत्तर दिले आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे झारखंड राज्याचे प्रभारी आरपीएन सिंग यानी या निकालांबाबत बोलताना दिली आहे. झारखडंमधील जे जे पक्ष आमच्यासोबत येण्यास उत्सुक असतील, त्या सर्वांसाठी आमचे दरवाजे खुले आहेत, असेही ते म्हणाले आहेत.
भाजपच्या फूट पाडणाऱ्या विचारांचा पराजय
झारखंडमध्ये काँग्रेस आणि मित्रपक्षांना सत्तास्थापनेचा कौल दिल्याबाबत झारखंडचे काँग्रेस पक्षाचे प्रभारी आरपीएन सिंग यांनी झारखंडच्या मतदारांचे आभार मानले आहेत. या विधानसभा निवडणुकीचे निकाल आमच्या अपेक्षेप्रमाणेच लागत असून, संपूर्ण चित्र स्पष्ट होईपर्यंत भाजप आणि आमच्या जागांमधील फरकही वाढणार आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. झारखंडच्या जनतेसह संपूर्ण देशातील जनता आता भारतीय जनता पक्षाच्या फूट पाडणाऱ्या धोरणांना कंटाळली आहे. ही जनता आता भारतीय जनता पक्षाला नक्कीच धडा शिकवेल, असेही सिंग म्हणाले.
८ कोटींची डॉगी हरवली, शोधल्यास मोठे बक्षिस
जेव्हीएम-आजसूला सोबत येण्याचा दिला संदेश
काँग्रेसच्या आघाडीत सर्व पक्षांचा सन्मान राखला जाईल असे सिंग यांनी जेव्हीएम आणि आजसू या पक्षांना संदेश देताना म्हटले आहे. इतरही पक्ष आमच्या सोबत येऊ शकतात असे आवाहन आपण इतर पक्षांना करत असल्याचेही ते म्हणाले. या महाआघाडीत सर्वांचाच सन्मान ठेवला जाईल. आमचे दरवाजे सर्वांसाठीच खुले आहेत, असे सिंग म्हणाले. आता सर्वांना एकत्र येत झारखंडच्या विकासासाठी एकजूट होऊन काम करण्याची वेळ आली आहे, असेही ते पुढे म्हणाले.
'अमृता फडणवीस या तर सत्तालोभी आनंदीबाई'
दरम्यान, दुपारी दीड वाजेपर्यंत काँग्रेस आघाडीलाल ४१ जागांवर. भारतीय जनता पक्षाला २९ जागांवर, आजसूला ३ जागांवर, जेव्हीएम पक्षाला ०३ जागांवर, तर इतरांना ५ जागांवर आघाडी मिळाली आहे. यात काँग्रेस आघाडीच्या १७ जागा वाढल्या असून, भारतीय जनता पक्षाच्या ९ जागा कमी झाल्याचे दिसत आहे. तसेच, या निवडणुकीत आजसू पक्षाच्या २ जागा कमी झाल्या असून जेव्हीएमच्या ५, तर इतरांची १ जागा कमी होत असल्याचे चित्र आहे.
भाजपच्या फूट पाडणाऱ्या विचारांचा पराजय
झारखंडमध्ये काँग्रेस आणि मित्रपक्षांना सत्तास्थापनेचा कौल दिल्याबाबत झारखंडचे काँग्रेस पक्षाचे प्रभारी आरपीएन सिंग यांनी झारखंडच्या मतदारांचे आभार मानले आहेत. या विधानसभा निवडणुकीचे निकाल आमच्या अपेक्षेप्रमाणेच लागत असून, संपूर्ण चित्र स्पष्ट होईपर्यंत भाजप आणि आमच्या जागांमधील फरकही वाढणार आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. झारखंडच्या जनतेसह संपूर्ण देशातील जनता आता भारतीय जनता पक्षाच्या फूट पाडणाऱ्या धोरणांना कंटाळली आहे. ही जनता आता भारतीय जनता पक्षाला नक्कीच धडा शिकवेल, असेही सिंग म्हणाले.
८ कोटींची डॉगी हरवली, शोधल्यास मोठे बक्षिस
जेव्हीएम-आजसूला सोबत येण्याचा दिला संदेश
काँग्रेसच्या आघाडीत सर्व पक्षांचा सन्मान राखला जाईल असे सिंग यांनी जेव्हीएम आणि आजसू या पक्षांना संदेश देताना म्हटले आहे. इतरही पक्ष आमच्या सोबत येऊ शकतात असे आवाहन आपण इतर पक्षांना करत असल्याचेही ते म्हणाले. या महाआघाडीत सर्वांचाच सन्मान ठेवला जाईल. आमचे दरवाजे सर्वांसाठीच खुले आहेत, असे सिंग म्हणाले. आता सर्वांना एकत्र येत झारखंडच्या विकासासाठी एकजूट होऊन काम करण्याची वेळ आली आहे, असेही ते पुढे म्हणाले.
'अमृता फडणवीस या तर सत्तालोभी आनंदीबाई'
दरम्यान, दुपारी दीड वाजेपर्यंत काँग्रेस आघाडीलाल ४१ जागांवर. भारतीय जनता पक्षाला २९ जागांवर, आजसूला ३ जागांवर, जेव्हीएम पक्षाला ०३ जागांवर, तर इतरांना ५ जागांवर आघाडी मिळाली आहे. यात काँग्रेस आघाडीच्या १७ जागा वाढल्या असून, भारतीय जनता पक्षाच्या ९ जागा कमी झाल्याचे दिसत आहे. तसेच, या निवडणुकीत आजसू पक्षाच्या २ जागा कमी झाल्या असून जेव्हीएमच्या ५, तर इतरांची १ जागा कमी होत असल्याचे चित्र आहे.