रांची:
रक्तदान वाढवण्यासाठी झारखंड सरकारने एक अनोखी योजना सुरू केली आहे. जे सरकारी कर्मचारी रक्तदान करतील त्यांना चार दिवसांची प्रासंगिक (सीएल) सुट्टी देण्यात येईल, अशी घोषणा झारखंड सरकारने केली आहे. यामुळे रक्तदात्यांमध्ये लक्षणीय वाढ होईल, असा विश्वास सरकारने व्यक्त केला आहे.
वर्षाला ३,५०,००० युनिट रक्ताची गरज
राष्ट्रीय स्वेच्छिक रक्तदान दिना (१ ऑक्टोबर) ला झारखंड सरकारने ही घोषणा केली. झारखंडला दरवर्षी ३,५०,००० युनिट रक्ताची गरज आहे. परंतु राज्यात केवळ १९,००० युनिट एवढचं रक्त संकलन होतंय. यामुळे झारखंड सरकारने रक्तदान वाढवण्यासाठी हे पाऊल उचललं आहे.
राज्याच्या आरोग्य, शिक्षण आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने रक्तदानासाठी सरकारी कर्माचऱ्यांना प्रत्सोहन देण्यासाठी कामकाजाच्या दिवसांत रक्तदानाच्या बदल्यात चार दिवसांची सुट्टी मंजूर करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान सोमवारी घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरादरम्यान ७७५ युनिट्स रक्त संकलन झाल्याची माहिती रेड क्रॉसकडून देण्यात आली.
रक्तदान वाढवण्यासाठी झारखंड सरकारने एक अनोखी योजना सुरू केली आहे. जे सरकारी कर्मचारी रक्तदान करतील त्यांना चार दिवसांची प्रासंगिक (सीएल) सुट्टी देण्यात येईल, अशी घोषणा झारखंड सरकारने केली आहे. यामुळे रक्तदात्यांमध्ये लक्षणीय वाढ होईल, असा विश्वास सरकारने व्यक्त केला आहे.
वर्षाला ३,५०,००० युनिट रक्ताची गरज
राष्ट्रीय स्वेच्छिक रक्तदान दिना (१ ऑक्टोबर) ला झारखंड सरकारने ही घोषणा केली. झारखंडला दरवर्षी ३,५०,००० युनिट रक्ताची गरज आहे. परंतु राज्यात केवळ १९,००० युनिट एवढचं रक्त संकलन होतंय. यामुळे झारखंड सरकारने रक्तदान वाढवण्यासाठी हे पाऊल उचललं आहे.
राज्याच्या आरोग्य, शिक्षण आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने रक्तदानासाठी सरकारी कर्माचऱ्यांना प्रत्सोहन देण्यासाठी कामकाजाच्या दिवसांत रक्तदानाच्या बदल्यात चार दिवसांची सुट्टी मंजूर करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान सोमवारी घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरादरम्यान ७७५ युनिट्स रक्त संकलन झाल्याची माहिती रेड क्रॉसकडून देण्यात आली.