अ‍ॅपशहर

'नागरिकत्व कायदा धुडकावण्याचा राज्यांना अधिकारच नाही'

केंद्र सरकारने मंजूर केलेला नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू न करण्याचा काही राज्यांनी निर्णय घेतलेला असतानाच केंद्र सरकारने राज्यांना कोणताही कायदा धुडकावण्याचा अधिकारच नसल्याचं स्पष्ट केलं आहे. नागरिकत्व कायदा हा केंद्राचा विषय आहे. त्याच्याशी राज्यांना काहीही घेणं-देणं नाही. त्यामुळे नागरिकत्व कायदा लागू करणार नाही, हे काही राज्ये कसं म्हणू शकतात? असा सवाल केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी केला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 15 Dec 2019, 10:42 pm
नवी दिल्ली: केंद्र सरकारने मंजूर केलेला नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू न करण्याचा काही राज्यांनी निर्णय घेतलेला असतानाच केंद्र सरकारने राज्यांना कोणताही कायदा धुडकावण्याचा अधिकारच नसल्याचं स्पष्ट केलं आहे. नागरिकत्व कायदा हा केंद्राचा विषय आहे. त्याच्याशी राज्यांना काहीही घेणं-देणं नाही. त्यामुळे नागरिकत्व कायदा लागू करणार नाही, हे काही राज्ये कसं म्हणू शकतात? असा सवाल केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी केला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम jitendra singh holds cong responsible for violence asserts caa is a subject of centre
'नागरिकत्व कायदा धुडकावण्याचा राज्यांना अधिकारच नाही'


प्रसारमाध्यमांशी बोलताना जितेंद्र सिंह यांनी हा सवाल केला आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू करणार नाही, असं काही राज्यांकडून बोललं जात आहे. त्यांचं हे म्हणणं समजण्यापलिकडे आहे. कारण हा केंद्राचा विषय आहे. हा कायदा लागू करण्यात आडकाठी टाकण्याचा राज्यांना विशेषाधिकार आहे, असं मला वाटत नाही, असं जितेंद्र सिंह म्हणाले.

CAAचा निर्णय हजार टक्के योग्य: PM मोदी

सिंह यांनी यावेळी काँग्रेसवर या कायद्यावरून राजकीय फायद्यासाठी हिंसा भडकविण्याचा आरोप केला. काही लोक चुकीचा हेतू ठेवून या विषयावर राजकारण करत आहेत. त्यात काँग्रेसचा मोठा हात आहे. काँग्रेस या आंदोलनात त्यांचा अजेंडा पुढे रेटण्याचं काम करत आहे, असा आरोप त्यांनी केला. आधी वातावरण चिघळलं होतं. आता परिस्थिती नियंत्रणात आहे. केवळ एक किंवा दोनच हिंसक आंदोलने झाली. आता परिस्थिती नियंत्रणात आलेली आहे, असंही ते म्हणाले.

नागरिकत्व कायद्यात बदलांचे शहांनी दिले संकेत

सावरकर यांच्यावरून सुरू झालेल्या राजकारणावर बोलताना ते म्हणाले की, काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या तुलनेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देशाचा प्रचंड विचार करतात. सावरकरांनी देशासाठी उल्लेखनीय योगदान दिलं आहे, हे विसरून चालणार नाही.

दरम्यान, कालपर्यंत पाकिस्तानकडून जे काम केलं जात होतं, ते आता काँग्रेस करत आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून काँग्रेसने ज्या पद्धतीने देशात आग लावण्याचं काम केलं आहे. त्यावरून नागरिकत्व विधेयक लागू करण्याचा आमचा निर्णय हजार टक्के योग्यच होता, हे सिद्ध झाले आहे, असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकत्व विधेयक लागू करण्याच्या निर्णयाचं स्वागत केलं. त्यांनी आज झारखंडमधील एका रॅलीत पहिल्यांदाच नागरिकत्व कायद्यावर भाष्य केलं होतं.

CAB: विरोधाला धार कायम; ईशान्य भारत धुमसताच

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज