अ‍ॅपशहर

पाकिस्तानला भारताचा तडाखा

भारतीय लष्कराच्या 'सर्जिकल स्ट्राइक'नंतर बिथरलेल्या पाकिस्ताननं जम्मू-काश्मीर सीमेवर शस्त्रसंधीचं उल्लंघन सुरूच ठेवलं असून काल रात्री आरएसपुरा व अरनिया सेक्टरमध्ये गोळीबार केला. त्यात भारताचे ११ नागरिक जखमी झाले आहेत. भारतीय लष्करानं या गोळीबाराला सडेतोड प्रत्युत्तर देत पाकिस्तानच्या पाच ते सहा चौक्या उद्ध्वस्त केल्या. त्यात पाकिस्तानचे तीन सैनिक मारले गेल्याचं वृत्त आहे.

Maharashtra Times 26 Oct 2016, 8:48 am
मटा ऑनलाइन वृत्त । राजौरी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम jk ceasefire violation by pakistan in rs pura sector
पाकिस्तानला भारताचा तडाखा


भारतीय लष्कराच्या 'सर्जिकल स्ट्राइक'नंतर बिथरलेल्या पाकिस्ताननं जम्मू-काश्मीर सीमेवर शस्त्रसंधीचं उल्लंघन सुरूच ठेवलं असून काल रात्री आरएसपुरा व अरनिया सेक्टरमध्ये गोळीबार केला. त्यात भारताचे ११ नागरिक जखमी झाले आहेत. भारतीय लष्करानं या गोळीबाराला सडेतोड प्रत्युत्तर देत पाकिस्तानच्या पाच ते सहा चौक्या उद्ध्वस्त केल्या. त्यात पाकिस्तानचे तीन सैनिक मारले गेल्याचं वृत्त आहे.

लष्करी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राजौरी जिल्ह्यातील नौशेरा व आरएसपुरा सेक्टरमध्ये काल सकाळी दहाच्या सुमारास पाकिस्तानकडून गोळीबाराला सुरुवात झाली. पाकिस्तानकडून उखळी तोफांचाही मारा करण्यात आला. त्यात आरएसपुरातील काही घरांचंही नुकसान झालं. सीमा सुरक्षा दलानं दिलेल्या प्रत्युत्तरात पाकिस्तानचं जबर नुकसान झालं आहे. गेल्या २० तासांपासून ही धूमश्चक्री सुरू असून सीमेपलीकडून अजूनही गोळीबार सुरूच आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज