अ‍ॅपशहर

‘बेरोजगारीने युवक अस्वस्थ’

'वाढती बेरोजगारी, ग्रामीण कर्जबाजारीपणा आणि शहरी अनागोंदीमुळे देशातील महत्त्वाकांक्षी तरुण अस्वस्थ झाले आहेत. वाढत्या बेरोजगारीसह नोकऱ्या गमावण्याच्या घटनांतही कमालीची वाढ झाली आहे', असे प्रतिपादन माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी रविवारी व्यक्त केले.

महाराष्ट्र टाइम्स 18 Feb 2019, 4:13 am
नवी दिल्ली : 'वाढती बेरोजगारी, ग्रामीण कर्जबाजारीपणा आणि शहरी अनागोंदीमुळे देशातील महत्त्वाकांक्षी तरुण अस्वस्थ झाले आहेत. वाढत्या बेरोजगारीसह नोकऱ्या गमावण्याच्या घटनांतही कमालीची वाढ झाली आहे', असे प्रतिपादन माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी रविवारी व्यक्त केले. दिल्लीच्या 'स्कूल ऑफ मॅनेजमेंट'मधील पदवीदान समारंभात सिंग बोलत होते. अर्थव्यवस्थेची कक्षा रुंदावण्यात सरकार अपयशी झाल्याची टीका त्यांनी केली. 'शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि सातत्याने होणारी शेतकऱ्यांची आंदोलने आपल्या अर्थव्यवस्थेत संरचनात्मक असंतुलन असल्याचे दर्शवतात. अर्थात, ही स्थिती मान्य करण्यासाठी गंभीर विश्लेषण आणि राजकीय इच्छाशक्तीची आवश्यकता आहे', असे सिंग म्हणाले. या वेळी त्यांनी मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांवरही टीकास्त्र सोडले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम jobless growth turning into job loss growth manmohan singh
‘बेरोजगारीने युवक अस्वस्थ’

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज