अ‍ॅपशहर

न्यायसंस्थेपुढे विश्वासार्हतेचं संकट: सरन्यायाधीश

'एक संस्था म्हणून न्यायपालिका सध्या विश्वासार्हतेचं संकट झेलत असून हे मोठं आव्हान आहे', असं स्पष्ट मत सरन्यायाधीश टी. एस. ठाकूर यांनी आज मांडलं. न्यायाधीशांनी आपल्या कर्तव्याप्रती तत्पर राहायला हवं, असा सल्लाही यावेळी सरन्यायाधीशांनी दिला.

Maharashtra Times 13 Mar 2016, 9:00 pm
मटा ऑनलाइन वृत्त । अलाहाबाद
महाराष्ट्र टाइम्स.कॉम judiciary facing crisis of credibility chief justice of india
न्यायसंस्थेपुढे विश्वासार्हतेचं संकट: सरन्यायाधीश


'एक संस्था म्हणून न्यायपालिका सध्या विश्वासार्हतेचं संकट झेलत असून हे मोठं आव्हान आहे', असं स्पष्ट मत सरन्यायाधीश टी. एस. ठाकूर यांनी आज मांडलं. न्यायाधीशांनी आपल्या कर्तव्याप्रती तत्पर राहायला हवं, असा सल्लाही यावेळी सरन्यायाधीशांनी दिला.

अलाहाबाद उच्च न्यायालयाने दीडशेव्या वर्षात पदार्पण केलं असून त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात सरन्यायाधीश ठाकूर बोलत होते. आपल्यापुढे अंतर्गत आणि बाहेरची अशी दुहेरी आव्हानं आहेत. भविष्यात यापेक्षाही मोठ्या आव्हानांचा सामना आपल्याला करायचा आहे. या आव्हानांसाठी सज्ज राहण्याची गरज आहे. एक लक्षात ठेवायला हवं की, न्यायपालिका एक संस्था आहे आणि त्यावर लोकांचं बारीक लक्ष असतं, असं सांगत न्या. ठाकूर यांनी न्यायाधीशांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून दिली. न्यायकक्षेबाहेरची आव्हानं पेलण्यास आम्ही समर्थ आहोत मात्र, जी संस्थेच्या अंतर्गत आव्हानं आहेत ती पार करण्यासाठी आपण सजग राहायला हवं, असं ठाकूर यांनी निक्षून सांगितलं.

बार असोसिएशन पुरेसं सहकार्य करत नसल्याने खटले लांबणीवर पडतात असं कधी-कधी न्यायाधीशांनाही वाटतं असा चिमटा घेतच प्रलंबित खटल्यांबाबत सरन्यायाधीशांनी चिंता व्यक्त केली. ते म्हणाले 'बार असोसिएशन सहकार्य करणार असेल तर जुने खटले निकाली काढण्यासाठी शनिवारीही न्यायदान करण्यास न्यायाधीश तयार आहेत. विशेषत: वर्षानुवर्षे कारागृहांमध्ये असणाऱ्या कैद्यांची प्रकरणं वेगाने निकाली काढली पाहिजेत.'

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज