अ‍ॅपशहर

शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांचं निधन

कांची कामकोटी पीठाचे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं आज निधन झालं. ते ८२ वर्षाचे होते. कांची कामकोटी पीठाचे ते ६९ वे शंकराचार्य होते.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 28 Feb 2018, 7:25 pm
चेन्नई: कांची कामकोटी पीठाचे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं आज निधन झालं. ते ८२ वर्षाचे होते. कांची कामकोटी पीठाचे ते ६९ वे शंकराचार्य होते.

शंकराचार्य जयेंद्र सरस्वती गेल्या काही महिन्यांपासून आजारी होते. वाढत्या वयामुळे त्यांचं शरीर उपचाराला साथ देत नव्हतं. गेल्या महिन्यात त्यांना श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने तात्काळ चेन्नईतील श्री रामचंद्र रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथेच त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांना कमी रक्तदाबाचाही त्रास होता. आज प्रकृती आणखीनच खालावल्याने त्यांची प्राणज्योत मालवली.
जयेंद्र सरस्वती यांचा जन्म १८ जुलै १९३५ मध्ये झाला होता. ते कांचीपुरम पीठाचे ६९ वे शंकराचार्य होते. ते १९५४ मध्ये शंकराचार्य बनले होते. चंद्रशेखेरेन्द्रा सरस्वती यांनी त्यांना त्यांचा उत्तराधिकारी म्हणून घोषित केलं होतं. कांचीपुरम मठाद्वारे अनेक शाळा आणि नेत्र रुग्णालये चालविले जातात. दरम्यान, कांचीपुरम वरदराज पेरुमल मंदिराचे व्यवस्थापक शंकरारमन यांच्या हत्या प्रकरणात जयेंद्र सरस्वती आरोपी होते. मात्र न्यायालयाने त्यांची या आरोपातून मुक्तता केली होती.

भाजप नेते राम माधव यांना शंकराचार्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. 'शंकराचार्य सरस्वती हे सुधारणावादी संत होते. त्यांनी समाजासाठी वाहून घेतलं होतं,' अशी भावना राम माधव यांनी टि्वटरवरून व्यक्त केली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज