अ‍ॅपशहर

kangana ranaut : कंगना पुन्हा बोलली, 'गांधींना भगतसिंगांची फाशी हवी होती, नेताजींना समर्थन दिले नाही'

स्वातंत्र्यावरील वक्तव्यावरून अभिनेत्री कंगना राणावत वादात अडकली आहे. पण कंगना तेवढ्यावरच थांबलेली नाही. तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट करून आता महात्मा गांधींवर निशाणा साधला आहे. यावरून पुन्हा वाद निर्माण होण्याची शक्यात आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 16 Nov 2021, 8:04 pm
नवी दिल्लीः देशभरात अनेक एफआयआर दाखल झाल्यानंतरही अभिनेत्री कंगना राणावत गप्प झालेली नाही. अभिनेत्रीने पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे. आता कंगनाने महात्मा गांधी आणि भगतसिंग यांच्याबद्दल, वक्तव्य केलं आहे. कंगनाने इंस्टाग्राम स्टोरीजवर एक न्यूज कटिंग आणि दोन मोठे संदेश पोस्ट केले आहेत. याद्वारे कंगनाने पुन्हा एकदा ‘भीक मागून मिळाले स्वातंत्र्य’ या विधानावर आपली भूमिका मांडली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम kangana ranaut post on instagram blames mahatma gandhi over bhagat singh
कंगना पुन्हा बोलली, 'गांधींना भगतसिंगांची फाशी हवी होती, नेताजींना समर्थन दिले नाही'


आपले आदर्श समजदारीने निवडाः कंगना

'ज्यांनी स्वातंत्र्यासाठी लढा दिला, त्यांना सत्तेच्या भुकेल्या आणि धूर्त लोकांनी त्यांच्या मालकांच्या स्वाधीन केले होते. हे तेच लोक होते ज्यांनी त्यांचे शोषण केले. यांच्यात लढण्याची हिंमत नव्हती किंवा त्यांचे रक्तही उसळले नाही... हेच लोक आम्हाला शिकवतात... जर तुम्हाला कोणी थप्पड मारली तर दुसर्‍या गालावर दुसरी थप्पड द्या आणि अशा प्रकारे तुम्हाला स्वातंत्र्य मिळेल. पण कोणालाही असे स्वातंत्र्य मिळत नाही. अशा प्रकारे फक्त भीक मिळते…. म्हणून आपले आदर्श हुशारीने निवडा, असं आपल्या पहिल्या मेसेजमध्ये कंगनाने लिहिलंय.

'भगतसिंगला फाशी द्यावी, अशी गांधींची इच्छा होती'

गांधींनी कधीही भगतसिंग किंवा नेताजींना पाठिंबा दिला नाही. भगतसिंगच्या फाशीला गांधींचा पाठिंबा होता, असे बरेच पुरावे आहेत. यामुळे कोणाचं समर्थन करावं हे तुम्ही ठरवलं पाहिजे. कारण या सर्व गोष्टी मनात ठेवून त्यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देणं पुरेसं नाही. खरं तर हे मौन अतिशय बेजबाबदार आणि वरवरचे आहे. प्रत्येकाला त्यांचा इतिहास आणि आदर्शाबद्दल माहिती असणं आवश्यक आहे, असं कंगनाने दुसऱ्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.

pm inaugurates purvanchal expressway : 'पूर्वांचल एक्स्प्रेस-वे'चे PM मोदींनी केले उद्घाटन; भाजपचा यूपीतील सत्ता राखण्याचा मार्ग!, चीनलाही इशारा

भीक मागून मिळाले स्वातंत्र्य?

गेल्या आठवड्यात अभिनेत्री कंगना राणावतच्या एका वक्तव्यावरून वाद झाला होता. भारताला खरे स्वातंत्र्य २०१४ मध्ये मिळाले. पूर्वी मिळालेले स्वातंत्र्य हे स्वातंत्र्य नव्हते तर भीक मागून मिळाले होते, असं वक्तव्य कंगनाने एका कार्यक्रमात केलं होतं. यावरून कंगनावर अनेक नेत्यांनी टीका केली होती.

गुजरातमध्ये रस्त्यांवर मांसाहार विक्रीला बंदी, स्टॉल्स-हातगाड्यांवर कारवाई

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज