मटा ऑनलाइन वृत्त । कानपूर
येत्या १९ डिसेंबरला कानपूरमध्ये होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी उत्तर प्रदेशातील भाजप कार्यकर्त्यांनी एक जुनी खुर्ची बाहेर काढली आहे. सभेदरम्यान मोदी या खुर्चीवर बसले, तर यूपीतील मुख्यमंत्रिपदाची खुर्ची भाजपला मिळेल, अशी आशा या कार्यकर्त्यांना वाटतेय. गेली तीन वर्षं त्यांनी ही खुर्ची सांभाळून ठेवली आहे आणि मोदींची 'लकी खुर्ची' असाच ते तिचा उल्लेख करतात.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदींनी १९ ऑक्टोबर २०१३ रोजी कानपूरमध्ये विजय शंखनाद सभा घेतली होती. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून ही त्यांची पहिलीच सभा होती. या सभेत मोदी ज्या खुर्चीवर बसले होते, ती खुर्ची कानपूर भाजपसाठी एकदम 'खास' आहे. कारण, लोकसभा निवडणुकीत त्यांनी यूपीमध्ये 'न भुतो' यश मिळवलं होतं. ८० पैकी ७१ जागांवर भाजपचं कमळ उमललं होतं. म्हणूनच, तेव्हापासून त्यांनी ही खुर्ची जिल्हा कार्यालयात जपून ठेवली आहे. त्यासाठी काचेचा एक बॉक्स तयार करण्यात आला होता. तसंच, या सभेत मोदींनी ज्या ग्लासमधून पाणी प्यायलं होतं आणि ज्या डब्यातून त्यांना लाडू भेट देण्यात आले होते, तो ग्लास आणि डबाही त्यांनी जतन केला आहे. त्यापैकी 'लकी खुर्ची' त्यांनी आता बाहेर काढली आहे.
नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर पहिल्यांदाच कानपूरला येत आहेत. स्वाभाविकच, भाजप कार्यकर्त्यांना त्यांच्या सभेविषयी सगळ्यांना उत्सुकता आहेच, पण या सभेत त्यांनी त्याच खुर्चीवर बसावं, अशीही त्यांनी इच्छा आहे. म्हणूनच त्यांनी या खुर्चीची डागडुजी करून ती पॉलिश वगैरे करून घेतली आहे. परिवर्तन यात्रा सभेत मोदी या खुर्चीत बसले, तर २०१७च्या विधानसभा निवडणुकीत भाजप सर्वाधिक जागा जिंकेल, अशा भावना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या. त्यामुळे आता मोदी या खुर्चीवर बसणार का आणि यूपीत पुन्हा भाजपला 'अच्छे दिन' येणार का, हे पुढच्या वर्षीच कळू शकेल.
येत्या १९ डिसेंबरला कानपूरमध्ये होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी उत्तर प्रदेशातील भाजप कार्यकर्त्यांनी एक जुनी खुर्ची बाहेर काढली आहे. सभेदरम्यान मोदी या खुर्चीवर बसले, तर यूपीतील मुख्यमंत्रिपदाची खुर्ची भाजपला मिळेल, अशी आशा या कार्यकर्त्यांना वाटतेय. गेली तीन वर्षं त्यांनी ही खुर्ची सांभाळून ठेवली आहे आणि मोदींची 'लकी खुर्ची' असाच ते तिचा उल्लेख करतात.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदींनी १९ ऑक्टोबर २०१३ रोजी कानपूरमध्ये विजय शंखनाद सभा घेतली होती. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून ही त्यांची पहिलीच सभा होती. या सभेत मोदी ज्या खुर्चीवर बसले होते, ती खुर्ची कानपूर भाजपसाठी एकदम 'खास' आहे. कारण, लोकसभा निवडणुकीत त्यांनी यूपीमध्ये 'न भुतो' यश मिळवलं होतं. ८० पैकी ७१ जागांवर भाजपचं कमळ उमललं होतं. म्हणूनच, तेव्हापासून त्यांनी ही खुर्ची जिल्हा कार्यालयात जपून ठेवली आहे. त्यासाठी काचेचा एक बॉक्स तयार करण्यात आला होता. तसंच, या सभेत मोदींनी ज्या ग्लासमधून पाणी प्यायलं होतं आणि ज्या डब्यातून त्यांना लाडू भेट देण्यात आले होते, तो ग्लास आणि डबाही त्यांनी जतन केला आहे. त्यापैकी 'लकी खुर्ची' त्यांनी आता बाहेर काढली आहे.
नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर पहिल्यांदाच कानपूरला येत आहेत. स्वाभाविकच, भाजप कार्यकर्त्यांना त्यांच्या सभेविषयी सगळ्यांना उत्सुकता आहेच, पण या सभेत त्यांनी त्याच खुर्चीवर बसावं, अशीही त्यांनी इच्छा आहे. म्हणूनच त्यांनी या खुर्चीची डागडुजी करून ती पॉलिश वगैरे करून घेतली आहे. परिवर्तन यात्रा सभेत मोदी या खुर्चीत बसले, तर २०१७च्या विधानसभा निवडणुकीत भाजप सर्वाधिक जागा जिंकेल, अशा भावना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या. त्यामुळे आता मोदी या खुर्चीवर बसणार का आणि यूपीत पुन्हा भाजपला 'अच्छे दिन' येणार का, हे पुढच्या वर्षीच कळू शकेल.