बेंगळुरू:
कर्नाटक विधानसभेतील १३ आमदारांनी शनिवारी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेस-जेडीएस सरकार धोक्यात आलं आहे. राजीनामा दिल्यानंतर या आमदारांना देण्यात आलेली मंत्रिपदाची ऑफरही त्यांनी धुडकावली असून आपण येत्या काळात भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचंही या १३ जणांनी सांगितलं आहे.
काँग्रेसच्या १० तर जेडीएसच्या ३ आमदारांनी शनिवारी विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा सुपूर्द केला होता. मुख्यमंत्री कुमारस्वामी आणि उपमुख्यमंत्री जी परमेश्वरन यांच्या कार्यपद्धतीवर हे आमदार नाराज आहेत. मंगळवारी कर्नाटक विधानसभेत या आमदारांच्या राजीनाम्यावर अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. पण त्याआधी या आमदारांना मनवण्यासाठी काँग्रेस-जेडीएस प्रयत्न करत आहे. राज्याचे सर्व कॅबिनेट मंत्री राजीनामा देतील आणि तुम्हाला कॅबिनेट मंत्रिपदं दिली जातील तसंच तुमच्या मतदारसंघांना विशेष निधी दिला जाईल अशा अनेक ऑफर्स मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी या आमदारांना दिल्या आहेत. सरकार वाचवण्यासाठी मी मंत्रिपदाचा राजीनामा देण्यास तयार आहे असं काँग्रेस नेते डी. शिवकुमार यांनी आमदारांना सांगितलं आहे.
तसंच सिद्धरमैय्या आणि मल्लिकार्जुन खड्गे या काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांनीही या आमदारांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला आहे. पण हे १३ही आमदार आपल्या राजीनाम्यावर ठाम आहे. काँग्रेस-जेडीएसच्या कोणत्याही आमिषाला बळी पडणार नसल्याचं या आमदारांनी सांगितलं आहे. उद्या सकाळपर्यंत या आमदारांना वळवण्यासाठी अजून प्रयत्न केले जाणार आहेत.
या १३ आमदारांच्या राजीनाम्यामागे भाजपचाच हात असल्याचा आरोपही खड्गे यांनी केला आहे. तर काँग्रेस-जेडीएस सरकारच्या कार्यपद्धतीमुळेच या आमदारांनी राजीनामा दिला असून आम्ही काहीही केलं नसल्याचं भाजपकडून सांगण्यात येतं आहे. मंगळवारी होणाऱ्या सत्राच्या पार्श्वभूमीवर भाजप आपल्या १०५ आमदारांना आज संध्याकाळी एका पंचतारांकित हॉटेलच्या रुम्समध्ये बंदिस्त करणार आहे.
काँग्रेस-जेडीएसने भाजपचे आमदार फोडू नयेत म्हणून ही काळजी घेण्यात येणार आहे. मंगळवारी विधानसभेत या आमदारांचा राजीनामा स्वीकारला गेला तर विद्यमान काँग्रेस-जेडीएस सरकार कोसळेल. त्यानंतर भाजप सत्तास्थापन करतं की राज्यात पुन्हा निवडणुकांचे पडघम वाजायला लागतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
कर्नाटक विधानसभेतील १३ आमदारांनी शनिवारी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेस-जेडीएस सरकार धोक्यात आलं आहे. राजीनामा दिल्यानंतर या आमदारांना देण्यात आलेली मंत्रिपदाची ऑफरही त्यांनी धुडकावली असून आपण येत्या काळात भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचंही या १३ जणांनी सांगितलं आहे.
तसंच सिद्धरमैय्या आणि मल्लिकार्जुन खड्गे या काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांनीही या आमदारांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला आहे. पण हे १३ही आमदार आपल्या राजीनाम्यावर ठाम आहे. काँग्रेस-जेडीएसच्या कोणत्याही आमिषाला बळी पडणार नसल्याचं या आमदारांनी सांगितलं आहे. उद्या सकाळपर्यंत या आमदारांना वळवण्यासाठी अजून प्रयत्न केले जाणार आहेत.
या १३ आमदारांच्या राजीनाम्यामागे भाजपचाच हात असल्याचा आरोपही खड्गे यांनी केला आहे. तर काँग्रेस-जेडीएस सरकारच्या कार्यपद्धतीमुळेच या आमदारांनी राजीनामा दिला असून आम्ही काहीही केलं नसल्याचं भाजपकडून सांगण्यात येतं आहे. मंगळवारी होणाऱ्या सत्राच्या पार्श्वभूमीवर भाजप आपल्या १०५ आमदारांना आज संध्याकाळी एका पंचतारांकित हॉटेलच्या रुम्समध्ये बंदिस्त करणार आहे.
काँग्रेस-जेडीएसने भाजपचे आमदार फोडू नयेत म्हणून ही काळजी घेण्यात येणार आहे. मंगळवारी विधानसभेत या आमदारांचा राजीनामा स्वीकारला गेला तर विद्यमान काँग्रेस-जेडीएस सरकार कोसळेल. त्यानंतर भाजप सत्तास्थापन करतं की राज्यात पुन्हा निवडणुकांचे पडघम वाजायला लागतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.