अ‍ॅपशहर

‘कासगंज दंगल हा कलंक’ : राम नाईक

उत्तर प्रदेशातील कासगंज येथे झालेला जातीय हिंसाचार म्हणजे राज्यासाठी ‘कलंक’ आहे. यापुढे अशा घटना घडू नयेत यासाठी योग्य पावले उचलावीत, या शब्दांत उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी राज्य सरकारला सुनावले.

Maharashtra Times 30 Jan 2018, 10:27 am
लखनऊ :उत्तर प्रदेशातील कासगंज येथे झालेला जातीय हिंसाचार म्हणजे राज्यासाठी ‘कलंक’ आहे. यापुढे अशा घटना घडू नयेत यासाठी योग्य पावले उचलावीत, या शब्दांत उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी राज्य सरकारला सुनावले. राज्यात गेल्या नऊ-दहा महिन्यांत अशी घटना प्रथमच घडत असून ही घटना अत्यंत ‘लाजिरवाणी’ आहे, असे कोरडे राज्यपाल नाईक यांनी ओढले आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ram-naik


उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी काही दिवसांपूर्वीच उत्तर प्रदेशमधील कायदा सुव्यवस्थेची स्थिती सुधारण्याचा सल्ला मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना दिला होता. दरम्यान, हिंसाचारप्रकरणी राज्य सरकारने कासगंजचे पोलिस अधीक्षक सुनील कुमार सिंह यांची मिरत पोलिस ट्रेनिंग स्कूलमध्ये बदली केली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज