वृत्तसंस्था, जम्मू
जम्मू-काश्मीरमध्ये आपली गमावलेली ओळख पुन्हा मिळवण्यासाठी काश्मिरी पंडित लढा उभारणार आहेत. ‘काश्मिरी पंडितांच्या पुढील पिढीचे भवितव्य’ या विषयावरील परिषदेमध्ये याबद्दलची प्रतिज्ञा घेण्यात आली, असे युथ ऑल इंडिया काश्मिरी समाज (वायएआयकेएस) या संघटनेने म्हटले आहे.
काश्मिरमध्ये दहशतवादामुळे १९८९-९० दरम्यान काश्मिरी पंडितांना काश्मीर सोडून जावे लागले होते. त्यानंतर हा समाज देशभरात स्थलांतरित झाला. मात्र, आपली मूळ ओळख पुन्हा मिळवण्यासाठी लढा उभारण्याचे काश्मिरी पंडितांच्या संघटनेने ठरवले आहे. ‘समाजाच्या नेत्यांनी समाजाची गमावलेली ओळख पुन्हा मिळवण्यासाठी; तसेच राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक हक्क मिळवण्यासाठी लढा उभारण्याचे ठरवले आहे,’ असे युथ ऑल इंडिया काश्मिरी समाज (वायएआयकेएस) या संघटनेने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
निर्वासित म्हणून जीवन जगणाऱ्या काश्मिरी पंडितांच्या राजकीय भवितव्याबद्दल प्रादेशिक आणि राष्ट्रीय पक्षांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी या परिषदेत करण्यात आली. निर्वासित झालेल्या या समाजासाठी कोणते स्थान दिले जाईल, हे राजकीय पक्षांनी निवडणूक लढवण्यापूर्वी आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात जाहीर करावे, अशी मागणीही करण्यात आली.
काश्मिरी पंडित समाजाचे राजकीय सक्षमीकरण व्हावे; तसेच विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत समाजाला आरक्षण देण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे. ‘वायएआयकेएस’ने काश्मीरमधील दहा जिल्ह्यांतील सर्व ४६ विधानसभा मतदारसंघांमध्ये समन्वयक नेमले आहेत. समाजाच्या कल्याणासाठी पूर्ण क्षमतेने काम करण्याची शपथ या समन्वयकांनी या परिषदेत घेतली.
मूळ मतदारसंघात नाव हवे
निर्वासित झालेल्या प्रत्येक काश्मिरी पंडिताच्या नावाचा समावेश तो ज्या मतदारसंघातून निर्वासित झाला तेथील मतदार यादीत केला जावा, अशी मागणीही निवडणूक आयोगाला करण्यात आली आहे. तयार झालेल्या मतदार याद्या निर्वासित विभागीय अधिकारी कार्यालये आणि सरकारी वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात याव्यात, असेही संघटनेच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. निर्वासित मतदारांसाठी असलेली ‘एम-फॉर्म’ची प्रक्रिया रद्द करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
निर्वासित काश्मिरी पंडित आपला काश्मीरवरील दावा सोडणार नाहीत. काश्मिरी पंडित हा काश्मीर खोऱ्यातील समाजाचा अविभाज्य भाग आहेत.
- आर. के. भट, प्रमुख, युथ ऑल इंडिया काश्मिरी समाज
जम्मू-काश्मीरमध्ये आपली गमावलेली ओळख पुन्हा मिळवण्यासाठी काश्मिरी पंडित लढा उभारणार आहेत. ‘काश्मिरी पंडितांच्या पुढील पिढीचे भवितव्य’ या विषयावरील परिषदेमध्ये याबद्दलची प्रतिज्ञा घेण्यात आली, असे युथ ऑल इंडिया काश्मिरी समाज (वायएआयकेएस) या संघटनेने म्हटले आहे.
काश्मिरमध्ये दहशतवादामुळे १९८९-९० दरम्यान काश्मिरी पंडितांना काश्मीर सोडून जावे लागले होते. त्यानंतर हा समाज देशभरात स्थलांतरित झाला. मात्र, आपली मूळ ओळख पुन्हा मिळवण्यासाठी लढा उभारण्याचे काश्मिरी पंडितांच्या संघटनेने ठरवले आहे. ‘समाजाच्या नेत्यांनी समाजाची गमावलेली ओळख पुन्हा मिळवण्यासाठी; तसेच राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक हक्क मिळवण्यासाठी लढा उभारण्याचे ठरवले आहे,’ असे युथ ऑल इंडिया काश्मिरी समाज (वायएआयकेएस) या संघटनेने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
निर्वासित म्हणून जीवन जगणाऱ्या काश्मिरी पंडितांच्या राजकीय भवितव्याबद्दल प्रादेशिक आणि राष्ट्रीय पक्षांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी या परिषदेत करण्यात आली. निर्वासित झालेल्या या समाजासाठी कोणते स्थान दिले जाईल, हे राजकीय पक्षांनी निवडणूक लढवण्यापूर्वी आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात जाहीर करावे, अशी मागणीही करण्यात आली.
काश्मिरी पंडित समाजाचे राजकीय सक्षमीकरण व्हावे; तसेच विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत समाजाला आरक्षण देण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे. ‘वायएआयकेएस’ने काश्मीरमधील दहा जिल्ह्यांतील सर्व ४६ विधानसभा मतदारसंघांमध्ये समन्वयक नेमले आहेत. समाजाच्या कल्याणासाठी पूर्ण क्षमतेने काम करण्याची शपथ या समन्वयकांनी या परिषदेत घेतली.
मूळ मतदारसंघात नाव हवे
निर्वासित झालेल्या प्रत्येक काश्मिरी पंडिताच्या नावाचा समावेश तो ज्या मतदारसंघातून निर्वासित झाला तेथील मतदार यादीत केला जावा, अशी मागणीही निवडणूक आयोगाला करण्यात आली आहे. तयार झालेल्या मतदार याद्या निर्वासित विभागीय अधिकारी कार्यालये आणि सरकारी वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात याव्यात, असेही संघटनेच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. निर्वासित मतदारांसाठी असलेली ‘एम-फॉर्म’ची प्रक्रिया रद्द करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
निर्वासित काश्मिरी पंडित आपला काश्मीरवरील दावा सोडणार नाहीत. काश्मिरी पंडित हा काश्मीर खोऱ्यातील समाजाचा अविभाज्य भाग आहेत.
- आर. के. भट, प्रमुख, युथ ऑल इंडिया काश्मिरी समाज