अ‍ॅपशहर

कलम ३७० रद्दचा प्रस्ताव; काश्मिरी पंडितांचा जल्लोष

जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा असलेले कलम ३७० रद्द होताच काश्मिरी पंडितांनी या निर्णयाचे स्वागत करीत जल्लोष साजरा केला. दिल्लीतील लाजपत नगरमध्ये लोकांनी डान्स करीत आणि मिठाईचे वाटप करीत या निर्णयाचे जोरदार स्वागत केले.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 5 Aug 2019, 7:44 pm
नवी दिल्लीः जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा असलेले कलम ३७० रद्द होताच काश्मिरी पंडितांनी या निर्णयाचे स्वागत करीत जल्लोष साजरा केला. दिल्लीतील लाजपत नगरमध्ये लोकांनी डान्स करीत आणि मिठाईचे वाटप करीत या निर्णयाचे जोरदार स्वागत केले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम kashmiri


कलम ३७० रद्द करून केंद्रातील मोदी सरकारने हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. काश्मिरमध्ये अल्पसंख्याक असलेल्या काश्मिरी पंडितांना या निर्णयाचा फायदा मिळणार असल्याची प्रतिक्रिया काश्मिरी समितीचे अध्यक्ष समीर च्रंगू यांनी 'एएनआय'शी बोलताना दिली. काश्मिरमधून जावे यासाठी काश्मिरी पंडितांवर बळजबरी केली जात असायची. परंतु, आता या निर्णयामुळे पंडितांना पुन्हा काश्मिरमध्ये जाता येईल, असेही ते यावेळी म्हणाले.



राजकीय नेते आणि पाकिस्तानकडून खतपाणी मिळत असल्यामुळे जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा अबाधित राहिला. परंतु, केंद्र सरकारच्या आजच्या एका निर्णयामुळे आता काश्मीर मुख्य प्रवाहात येईल, असे अन्य एका काश्मिरी पंडिताने म्हटले. केंद्र सरकारच्या आजच्या निर्णयामुळे देशातील कोणत्याही नागरिकाला जम्मू-काश्मीरमध्ये मालमत्ता खरेदी करण्याची मुभा मिळणार आहे. केंद्र सरकारच्या निर्णयानंतर हरयाणातील गुरूग्राममध्ये काश्मिरी पंडितांनी एकत्र येत या निर्णयाचे स्वागत केले. तिरंगा फडकवून आणि मिठाईचे वाटप करून त्यांनी आपला आनंद साजरा केला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज