नवी दिल्ली
दिल्लीचे माजी मंत्री आणि आम आदमी पक्षातून निलंबित केलेले कपिल मिश्रा यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर पुन्हा नव्याने आरोप केले आहेत. कार्यालयात जाण्यासाठी वेळ नाही पण 'सरकार-३' चित्रपटासाठी वेळ असल्याचे म्हणत केजरीवाल दांडीबहाद्दूर असल्याची घणाघाती टीका कपिल मिश्रांनी केली.
एका ब्लॉगद्वारे कपिल मिश्रा यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला. दिल्लीच्या जनतेला कल्पनादेखील नसेल की त्यांचा मुख्यमंत्री आपल्या कार्यालयात जात नाही. मुख्यमंत्री वर्षभरात अवघ्या एक-दोन दिवसच आपल्या कार्यालयात गेले असल्याचे मिश्रा यांनी म्हंटले. जनतेपासून दूर झालेले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल घरातून बाहेर पडले तेही 'सरकार-३' चित्रपट पाहण्यासाठी' अशा शब्दांत कपिल मिश्रा यांनी केजरीवालांवर जोरदार हल्ला बोल केला.
My Blog Post on Arvind Kejriwal Ji pic.twitter.com/bXCy3EGpRW — Kapil Mishra (@KapilMishraAAP) May 17, 2017 अरविंद केजरीवाल हे सगळ्यात कमी काम करणारे असून जास्त सुट्या घेणारे मुख्यमंत्री असल्याची टीका मिश्रा यांनी केली. भ्रष्टाचाराची सर्वाधिक प्रकरणे असलेले मुख्यमंत्री अशी केजरीवालांची लवकरच ओळख होणार असल्याचे कपिल मिश्रा यांनी म्हंटले. पक्षातून निलंबित केल्यानंतर कपिल मिश्रा यांनी भ्रष्टाचाराचे आरोप करत खळबळ उडवून दिली होती.
दिल्लीचे माजी मंत्री आणि आम आदमी पक्षातून निलंबित केलेले कपिल मिश्रा यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर पुन्हा नव्याने आरोप केले आहेत. कार्यालयात जाण्यासाठी वेळ नाही पण 'सरकार-३' चित्रपटासाठी वेळ असल्याचे म्हणत केजरीवाल दांडीबहाद्दूर असल्याची घणाघाती टीका कपिल मिश्रांनी केली.
एका ब्लॉगद्वारे कपिल मिश्रा यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला. दिल्लीच्या जनतेला कल्पनादेखील नसेल की त्यांचा मुख्यमंत्री आपल्या कार्यालयात जात नाही. मुख्यमंत्री वर्षभरात अवघ्या एक-दोन दिवसच आपल्या कार्यालयात गेले असल्याचे मिश्रा यांनी म्हंटले. जनतेपासून दूर झालेले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल घरातून बाहेर पडले तेही 'सरकार-३' चित्रपट पाहण्यासाठी' अशा शब्दांत कपिल मिश्रा यांनी केजरीवालांवर जोरदार हल्ला बोल केला.
My Blog Post on Arvind Kejriwal Ji pic.twitter.com/bXCy3EGpRW — Kapil Mishra (@KapilMishraAAP) May 17, 2017 अरविंद केजरीवाल हे सगळ्यात कमी काम करणारे असून जास्त सुट्या घेणारे मुख्यमंत्री असल्याची टीका मिश्रा यांनी केली. भ्रष्टाचाराची सर्वाधिक प्रकरणे असलेले मुख्यमंत्री अशी केजरीवालांची लवकरच ओळख होणार असल्याचे कपिल मिश्रा यांनी म्हंटले. पक्षातून निलंबित केल्यानंतर कपिल मिश्रा यांनी भ्रष्टाचाराचे आरोप करत खळबळ उडवून दिली होती.