अ‍ॅपशहर

घरात पैसा यावा म्हणून जोडप्यानं दिला दोन महिलांचा बळी, मृतदेह घरात पुरले; थरारक घटना

Kerala Crime News: एर्नाकुलममधून या महिलांची तस्करी करण्यात आली होती. या दोघींची तिरुवल्ला येथे हत्या करण्यात आली आहे. शिहाबवर महिलांना आमिष देऊन तिरुवल्ला येथे आणल्याचा आरोप आहे.

Authored byनुपूर उप्पल | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 11 Oct 2022, 5:06 pm
कोच्ची: केरळमधील त्रिरुवल्लामध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इथे घरात पैसा आणि संपत्ती यावी म्हणून दोन महिलांचा बळी देण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी पती-पत्नीसह ३ जणांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आधी महिलांचा गळा चिरून खून केला. त्यानंतर त्यांना पुरले. या दोन्ही महिला लॉरटी विक्री करणाऱ्या असल्याची माहिती आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Kerala human sacrifice news
घरात पैसा यावा म्हणून दोन महिलांचा बळी दिला, मृतदेह घरात पुरले


रोसेलिन आणि पद्मा अशी मृत महिलांची नावे सांगितली जात आहेत. एक महिला जूनपासून बेपत्ता होती तर दुसरी सप्टेंबरपासून बेपत्ता होती. दोघी बेपत्ता झाल्याप्रकरणी पोलीस तपास करत असतानाच हा धक्कादायक खुलासा समोर आला आहे. प्रकरणाच्या तपासादरम्यान महिलांचा बळी दिल्याचे पोलिसांना समजले. या प्रकरणी पोलिसांनी त्रिरुवल्ला येथील रहिवासी भगवल सिंग आणि त्याची पत्नी लीला आणि दुसरा आरोपी शिहाब यांना ताब्यात घेतले आहे. तिघांचीही चौकशी सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एर्नाकुलममधून या महिलांची तस्करी करण्यात आली होती. या दोघींची तिरुवल्ला येथे हत्या करण्यात आली आहे. शिहाबवर महिलांना आमिष देऊन तिरुवल्ला येथे आणल्याचा आरोप आहे. त्याचवेळी भगवल सिंह आणि त्यांची पत्नी लीला यांच्यावर दोन्ही महिलांचा बळी दिल्याचा आरोप आहे.

पोलीस आयुक्त सीएच नागराजू यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, मानवी बळी देण्याची शक्यता आहे. महिलांचे मृतदेह बाहेर काढण्यासाठी आम्ही तपास करत आहोत. महिलांचा शिरच्छेद करण्यात आला आहे आणि त्यांचे मृतदेह पठाणमथिट्टा येथील एलांथूर येथे पुरण्यात आले. याप्रकरणी काही जणांना पोलीस कोठडीत घेऊन त्यांची चौकशी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

पोलीस आयुक्त सी.एच.नागाराजू म्हणाले की, महिलांची बळी देण्याचा मुख्य उद्देश या दाम्पत्याला आर्थिक समृद्धी मिळावी हाच होता. त्यांनी सांगितले की या जोडप्याने आणि एजंटने आपला गुन्हा कबूल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे.

पोलीस आयुक्तांच्या म्हणण्यानुसार, आरोपी दाम्पत्य आर्थिक संकटाचा सामना करत होते आणि त्यांनी देवाला प्रसन्न करण्यासाठी आणि संकटातून बाहेर पडण्यासाठी महिलांचा बळी देण्याचा निर्णय घेतला. त्यांनी महिलांची हत्या करून मृतदेह पुरले.
लेखकाबद्दल
नुपूर उप्पल
नुपूर उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत, याआधी टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, इन मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ७ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक लिखाणाची आवड. गुन्हेगारीसंबंधित, विज्ञानविषयक बातम्यांमध्ये हातखंडा... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज