शीख तरुणांच्या सहाय्याने खलिस्तानवाद्यांचे ‘मोड्युल’
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
खलिस्तानवादी दहशतवादी ब्रिटिश कोलंबियातील मिशन सिटीजवळ कॅम्प चालवत असून, पंजाबात हल्ले घडवण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे, असा इशारा पंजाबच्या गुप्तचर यंत्रणांनी कॅनडा सरकारला दिल्याचे वृत्त ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिले आहे. कॅनडातील हरदीप निज्जार याने ‘खलिस्तान टेरर फोर्स’चा (केटीएफ) ऑपरेशनल हेड म्हणून जबाबदारी स्वीकारली असून, हल्ले करण्यासाठी शीख तरुणांचा समावेश असलेले ‘मोड्युल’तयार केले आहे.
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडेऊ यांच्या सरकारला हा इशारा पाठवण्यात आला आहे. अलीकडेच भारतात पठाणकोट हवाई तळावर हल्ला झाला होता. त्याचा संदर्भ इशाऱ्यात घेण्यात आला आहे. ‘निज्जार पाकिस्तानातून शस्त्रास्त्रांची व्यवस्था करणार होता; पण पठाणकोट हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत-पाकिस्तान सीमेवर हाय अॅलर्ट जारी करण्यात आला असल्याने त्याची कल्पना पूर्णत्वास गेली नाही,’ असे त्या इशाऱ्यात म्हटले होते.
२००७मध्ये शिंगार सिनेमामध्ये झालेल्या स्फोटात त्याचा सहभाग असल्याचा आरोप असून, तो पंजाबातील वाँटेड दहशतवादी आहे. १९९५पासून तो कॅनडाच्या पासपोर्टवर तेथील सरी शहरात राहतो. अन्य एका वृत्तानुसार, पाकिस्तानची आयएसआय ही गुप्तचर यंत्रणा खलिस्तानला पाठिंबा देण्यासाठी कॅनडात प्रयत्न करत असल्याचे धागेदोरे भारतीय गुप्तचर यंत्रणांनी केंद्र सरकारला दिले होते.
नरेंद्र मोदी यांचे सरकार कॅनडातील शीख समुदायापर्यंत पोहोचण्यासाठी विविध मार्गांनी प्रयत्नशील आहे. तरीही कॅनडात फुटीरतावादी चळवळ मूळ धरते आहे. खलिस्तानसाठीचा पाठिंबा वाढू लागल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे. अनेक पाकिस्तानवादी काश्मिरी फुटीरतावाद्यांची खलिस्तानला सहानुभूती आहे. तसेच पाकिस्तानचे टोरांटोमधील कॉन्सुल जनरल अशगर अली गोलो यांचा खलिस्तानला असलेला पाठिंबा तर सर्वश्रृत आहे. गेल्या एप्रिलमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात गोलो उपस्थित असताना खलिस्तानचा झेंडाही फडकला होता. गुरुदासपूर दहशतवादी हल्ल्यानंतर त्याचा खलिस्तानशी काहीतरी संबंध असण्याची शक्यता वर्तवली गेली होती.
कारवाईची मागणी
‘पाकिस्तानच्या आयएसआयच्या निधीच्या बळावर पंजाबात दहशतवादी हल्ल्याचे नियोजन करणाऱ्यांविरोधात सरकारने वेळीच कठोर कारवाई करावी,’ अशी मागणी ‘ऑल इंडिया अँटी टेररिस्ट फ्रंट’द्वारे (एआयएटीएफ) पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे करण्यात आली आहे. ‘हे सरकार खूप कठोर आहे आणि दहशतवादाविरोधात लढण्याची त्यांची भूमिका स्पष्ट आहे. तरीही आत्ताची बाब सरकारने गांभीर्याने घ्यायला हवी,’ असे ‘एआयएटीएफ’चे अध्यक्ष मनिंदरजितसिंग बिट्टा यांनी सांगितले.
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
खलिस्तानवादी दहशतवादी ब्रिटिश कोलंबियातील मिशन सिटीजवळ कॅम्प चालवत असून, पंजाबात हल्ले घडवण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे, असा इशारा पंजाबच्या गुप्तचर यंत्रणांनी कॅनडा सरकारला दिल्याचे वृत्त ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिले आहे. कॅनडातील हरदीप निज्जार याने ‘खलिस्तान टेरर फोर्स’चा (केटीएफ) ऑपरेशनल हेड म्हणून जबाबदारी स्वीकारली असून, हल्ले करण्यासाठी शीख तरुणांचा समावेश असलेले ‘मोड्युल’तयार केले आहे.
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडेऊ यांच्या सरकारला हा इशारा पाठवण्यात आला आहे. अलीकडेच भारतात पठाणकोट हवाई तळावर हल्ला झाला होता. त्याचा संदर्भ इशाऱ्यात घेण्यात आला आहे. ‘निज्जार पाकिस्तानातून शस्त्रास्त्रांची व्यवस्था करणार होता; पण पठाणकोट हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत-पाकिस्तान सीमेवर हाय अॅलर्ट जारी करण्यात आला असल्याने त्याची कल्पना पूर्णत्वास गेली नाही,’ असे त्या इशाऱ्यात म्हटले होते.
२००७मध्ये शिंगार सिनेमामध्ये झालेल्या स्फोटात त्याचा सहभाग असल्याचा आरोप असून, तो पंजाबातील वाँटेड दहशतवादी आहे. १९९५पासून तो कॅनडाच्या पासपोर्टवर तेथील सरी शहरात राहतो. अन्य एका वृत्तानुसार, पाकिस्तानची आयएसआय ही गुप्तचर यंत्रणा खलिस्तानला पाठिंबा देण्यासाठी कॅनडात प्रयत्न करत असल्याचे धागेदोरे भारतीय गुप्तचर यंत्रणांनी केंद्र सरकारला दिले होते.
नरेंद्र मोदी यांचे सरकार कॅनडातील शीख समुदायापर्यंत पोहोचण्यासाठी विविध मार्गांनी प्रयत्नशील आहे. तरीही कॅनडात फुटीरतावादी चळवळ मूळ धरते आहे. खलिस्तानसाठीचा पाठिंबा वाढू लागल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे. अनेक पाकिस्तानवादी काश्मिरी फुटीरतावाद्यांची खलिस्तानला सहानुभूती आहे. तसेच पाकिस्तानचे टोरांटोमधील कॉन्सुल जनरल अशगर अली गोलो यांचा खलिस्तानला असलेला पाठिंबा तर सर्वश्रृत आहे. गेल्या एप्रिलमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात गोलो उपस्थित असताना खलिस्तानचा झेंडाही फडकला होता. गुरुदासपूर दहशतवादी हल्ल्यानंतर त्याचा खलिस्तानशी काहीतरी संबंध असण्याची शक्यता वर्तवली गेली होती.
कारवाईची मागणी
‘पाकिस्तानच्या आयएसआयच्या निधीच्या बळावर पंजाबात दहशतवादी हल्ल्याचे नियोजन करणाऱ्यांविरोधात सरकारने वेळीच कठोर कारवाई करावी,’ अशी मागणी ‘ऑल इंडिया अँटी टेररिस्ट फ्रंट’द्वारे (एआयएटीएफ) पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे करण्यात आली आहे. ‘हे सरकार खूप कठोर आहे आणि दहशतवादाविरोधात लढण्याची त्यांची भूमिका स्पष्ट आहे. तरीही आत्ताची बाब सरकारने गांभीर्याने घ्यायला हवी,’ असे ‘एआयएटीएफ’चे अध्यक्ष मनिंदरजितसिंग बिट्टा यांनी सांगितले.